शनिवार, १ ऑगस्ट, २०१५

गाथा अभंग ०९

अभंग ०९

आपुलिया हिता जो असे जागता । धन्य माता पिता तयाचिया ॥१॥

कुळीं कन्यापुत्र होतीं जीं सात्त्विक । तयाचा हरिख वाटे देवा ॥ध्रु.॥

गीता भागवत करिती श्रवण । आणीक चिंतन विठोबाचें ॥२॥

तुका म्हणे मज घडो त्याची सेवा । तरी माझ्या दैवा पार नाहीं ॥३॥

अर्थ :-- ज्याला आपल्या हिताची चिंता असते, ज्याला आपले हित कळते. त्याचे माय बाप धन्य होतात ।।1।।

ज्या कुळामधे सात्विक रुत्तिचि मुले-मूली जन्माला येतात त्या कुळाविषयी परमेश्वरालादेखिल आदर वाटतो ।।ध्रु।।

अशी सात्विक रुत्तीची मुले गीता-भागवत श्रवण करतात, विठ्ठलाचे चिंतन करतात ।।2।।

अश्या लोकांची सेवा माझ्या हातून घडली तर माझ्या सारखा भाग्यवान मीच ठरेल, असे तुकोबा या अभंगात म्हणतात ।।3।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा