अभंग ६७
संवसारतापें तापलों मी देवा । करितां या सेवा कुटुंबाची ॥१॥
म्हणऊनी तुझे आठविले पाय । ये वो माझे माय पांडुरंगे ॥ध्रु.॥
बहुतां जन्मींचा जालों भारवाही । सुटिजे हें नाहीं वर्म ठावें ॥२॥
वेढियेलों चोरीं अंतर्बाह्यात्कारीं । कणव न करी कोणी माझी ॥३॥
बहु पांगविलों बहु नागविलों । बहु दिवस जालों कासाविस ॥४॥
तुका म्हणे आतां धांव घाली वेगीं । ब्रीद तुझें जगीं दीननाथा ॥५॥
अर्थ :- कुटुंबाची सेवा करता करता मी या प्रपंचिक त्रासाने त्रासुन गेलो आहे ।।1।।
म्हणून मी तुझे चिंतन करत आहे, हे पांडुरंगा, मला भेटायला ये ।।ध्रु।।
अनेक जन्मांचा भार वाहून मी श्रमलो आहे, यातून सुतन्याचा उपाय माला सापडत नहीं ।।2।।
कामक्रोधादिक षडरीपुंनी माला चहुबाजूंनी वेढले आहे, माझी दया कुणालाच येत नाही ।।2।।
त्यामुळे मी आस्वस्त झालो आहे, सर्वांनी माला लुटले आहे, माझी तळमळ होत आहे ।।4।।
तुकोबा म्हणतात, हे दिनानाथ, अता तूच माझा तारणहार आहेस, अनाथांचा तू नाथ आहेस, अशी जगी तुझी ख्याति आहे, तेव्हा तूच अता माझे रक्षण कर ।।5।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा