विटीडांडू
गाथा अभंग१५०
मेळउनि सकळ गोपाळ । कांहीं करिती विचार ॥१॥
चला जाऊं चोरूं लोणी । आजि घेऊं चंद्रधणी ।
वेळ लावियेला अझुणी । एकाकरितां गडे हो ॥ध्रु.॥
वाट काढिली गोविंदीं । मागें गोपाळांची मांदी ॥२॥
अवघा चि वावरे । कळों नेदी कोणा फिरे ॥३॥
घर पाहोनि एकांताचें । नवविधा नवनीताचें ॥४॥
रिघे आपण भीतरी । पुरवी माथुलियाच्या हरी ॥५॥
बोलों नेदी म्हणे स्थिर । खुणा दावी खा रे क्षीर ॥६॥
अर्थ :- कृष्णने सर्व गोपाळ सवंगडिंना गोळा केले. सारे मिळून विचार करू लागले ।।1।।
गोपाळांनो, चला, गौळणीच्या घरी जाऊन मन तृप्त होईपर्यंत लोनी चोरून खाऊ. मित्रांनो, तुम्ही काय करीत आहात? विलंब का लावतात ? लवकर चला ।।ध्रु।।
कृष्णने वाट धकविलि. त्याचा माघे सारे गूपाल निघाले ।।2।।
जो देव आपले स्वरुप दिसून डेत नाही, तोच देव सर्वत्र सांच्यार करात आहे. स्वेच्छेने सर्व प्रकारचे खेळ खेळत आहे।।3।।
ज्या ठिकाणी नवविधि भक्तीचे नवनीत आहे, असे एकांटाचे घर पाहू ।।4।।
त्याने स्वतः माजघरात शिरुण भांड्याचा शोध घेतला. नवविधा भक्तीच्या लोण्याने भरलेली भांडी गोपाळांकडे दिली ।।5।।
खाताने तो कुणालाही बोलू देत नव्हता. 'गप्प रहा' असे सांगत होता, भक्तिरूपि लोनी खा आणि त्यावर ज्ञानरूपी दूध प्या अश्या कहना टी9 करात आहे ।।6।।
तुकाराम महाराज म्हणतात, भक्तिरूपि लोनी मीही खाल्ले आहे आणि मी भगवंताची सेवाहि करीत आहे ।।7।।