गौळण अभंग १२४
या हो या चला जाऊं सकळा । पाहों हा सोहळा आजि वृंदावनींचा ॥१॥
वाइला गोपाळें वेणुनाद पडे कानीं । धीर नव्हे मनीं चित्त जालें चंचळ ॥ध्रु.॥
उरलें तें सांडा काम नका करूं गोवी । हे चि वेळ ठावी मज कृष्णभेटीची ॥२॥
निवतील डोळे याचें श्रीमुख पाहातां । बोलती तें आतां घरचीं सोसूं वाईट ॥३॥
कृष्णभेटीआड कांहीं नावडे आणीक । लाज तरी लोक मन जालें उदास ॥४॥
एकाएकीं चालियेल्या सादावीत सवें । तुका म्हणे देवें रूपें केल्या तन्मय ॥५॥
अर्थ :- बायानो, या. आपण सारयाजनी जाऊ आणि वृंदावनी काल्याचा सोहळा पाहू ।।1।।
भगवान् श्रीकृष्ण बासरी वाजवित आहे. त्या वेणुनादामुळे जाण्यासाठी मन आतुर झाले आहे. हा विलंब माला सहन होत नाही ।।ध्रु।।
संसारातील काम राहीले असतील तर राहुद्यात. त्यात अडकून राहु नाका; कारण मानवी औयुषातील श्रीकृष्णभेटीची हीच वेळ आहे, मला याची खत्री आहे ।।2।।
भगवान् श्रीकृष्णचे रूप बघुन डोळे निवतील. घरची अडचणी आननारे कामे तशीच सोसु ।।3।।
कृष्णभेटिच्या आड़ आलेले काहीही, कोणीही मला सहन होत नाही. लोक मर्यादा पालावि हे जरी खरे असले, तरि मला ते मान्य नाही. संसाराविषयी माझे नम उदास झाले आहे. त्याला काय करावे ? ।।4।।
तुकाराम महाराज म्हणतात, गोपिका एकमेकिंना वृंदावानात येण्यासाठी सूचना देत जात आहेत; कारण भगवंतने आपल्या सुंदर, सुकुमार रूपाने त्यांना तद्रूप करुण टाकले आहे ।।5।।.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा