अभंग ११२
काय कशी करिती गंगा । भीतरिं चांगा नाहीं तो ॥१॥
अधणीं कुचर बाहेर तैसा । नये रसा पाकासि ॥ध्रु.॥
काय टिळे करिती माळा । भाव खळा नाहीं त्या ॥२॥
तुका म्हणे प्रेमें विण । बोले भुंके अवघा शीण ॥३॥
अर्थ :- ज्याचे अंत:करण शुद्ध नाही त्याला काशिक्षेत्र, गंगाजल काय उपयोगाचे ? ।।1।।
एखादा कुजका दाना रसात टाकला तरी तो चविष्ट होत नाही ।।ध्रु।।
ज्याच्या मनामधे भक्तिभाव नाही, त्याने कपाळि गंधटिळा, गळ्यात तुलशिचि माळ घातली तरी त्याचा काय उपयोग ? ।।2।।
तुकाराम महाराज म्हणतात, की ज्याच्या मनात शुद्ध भक्तिभाव नाही, त्याचे बोलने कुत्र्याच्या भुकन्यासारखे व्यर्थ आहे ।।3।।.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा