शुक्रवार, ४ सप्टेंबर, २०१५

११२काय कशी करिती गंगा । भीतरिं चांगा नाहीं तो

अभंग ११२

काय कशी करिती गंगा । भीतरिं चांगा नाहीं तो ॥१॥

अधणीं कुचर बाहेर तैसा । नये रसा पाकासि ॥ध्रु.॥

काय टिळे करिती माळा । भाव खळा नाहीं त्या ॥२॥

तुका म्हणे प्रेमें विण । बोले भुंके अवघा शीण ॥३॥

अर्थ :- ज्याचे अंत:करण शुद्ध नाही त्याला काशिक्षेत्र, गंगाजल काय उपयोगाचे ? ।।1।।

एखादा कुजका दाना रसात टाकला तरी तो चविष्ट होत नाही ।।ध्रु।।

ज्याच्या मनामधे भक्तिभाव नाही, त्याने कपाळि गंधटिळा, गळ्यात तुलशिचि माळ घातली तरी त्याचा काय उपयोग ? ।।2।।

तुकाराम महाराज म्हणतात, की ज्याच्या मनात शुद्ध भक्तिभाव नाही, त्याचे बोलने कुत्र्याच्या भुकन्यासारखे व्यर्थ आहे ।।3।।.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा