शुक्रवार, ४ सप्टेंबर, २०१५

१०९चाल केलासी मोकळा । बोल विठ्ठल वेळोवेळां

अभंग १०९

चाल केलासी मोकळा । बोल विठ्ठल वेळोवेळां ॥१॥

तुज पापचि नाहीं ऐसें । नाम घेतां जवळीं वसे ॥ध्रु.॥

पंच पातकांच्या कोडी । नामें जळतां न लगे घडी ॥२॥

केलीं मागें नको राहों । तुज जमान आम्ही आहों ॥३॥

करीं तुज जीं करवती । आणिक नामें घेऊं किती ॥४॥

तुका म्हणे काळा । रीग नाहीं निघती ज्वाळा ॥५॥

अर्थ :- विठ्ठलाच्या नामस्मरनाने तुला पापांतुन रिकामे केले आहे, आता तरी तू विठ्ठलाचे नामस्मरण करीत रहा ।।1।।

अखंड नामस्मरण करीत राहिलास तर पाप तुझ्याजवळही येणार नाही ।।ध्रु।।

पाच कोटि महापातकेसुद्धा मानस्मरनाने जाळून भस्म होतात ।।2।।

यापुढे तू कितीही पातक केलि तरी नामस्मरनाने ती नष्ट होतील, याची जबाबदारी आम्ही घेतो ।।3।।

नामस्मरनाने नष्ट होणारी हजारो पापे आहेत, याची किती नावे सांगू ?।।4।।

तुकोबा म्हणतात, नामस्मरनाने निर्माण होणाऱ्या अग्निमधे महापातके जाळण्याचे सामर्थ्य आहे ।।5।।.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा