गाई - अभंग १
गाथा अभंग१३२
आम्हां घरीं एक गाय दुभता हे । पान्हा न समाये त्रिभुवनीं ॥१॥
वान ते सांवळी नांव ते श्रीधरा । चरे वसुंधरा चौदा भुवनें ॥ध्रु.॥
वत्स नाहीं माय भलत्या सवें जाय । कुर्वाळी तो लाहे भावभरणा ॥२॥
चहूं धारीं क्षीर वोळली अमुप । धाले सनकादिक सिद्ध मुनी ॥३॥
तुका म्हणे माझी भूक तेथें काय । जोगाविते माय तिन्ही लोकां ॥४॥
अर्थ :- आमच्या घरी एक गाय, आहे व ती दूध देते. तिने पाणा सोडलाकि त्या दुधाने त्रिभुवन भरून जाते; त्रिभुवनातहि ते मावत नाही ।।1।।
अशी ती गाय सावळ्या रंगाची असून तिचे नाव श्रीधरा असे आहे. पृथ्वी सह चौदा भुवनांत ती चरत असते ।।ध्रु।।
तिला एकहि वासरु नाही. ती कोनाबरोबरही जाते. भावपूर्वतेने जो कुणी तिला कुरवाळेल. त्याला ती पोटभर दूध देते ।।2।।
चारही सडांतून धारा सोडून अमाप दूध देते. ते दूध पिउन ऋषि मुनि तृप्त झाले आहेत ।।3।।
तुकाराम महाराज म्हणतात, अशी ही गाय त्रैलोक्यल तृप् करू शकते . त्यापुढे माझी भूक ती कितिशी अशनार? ।।4।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा