शुक्रवार, ४ सप्टेंबर, २०१५

११७नुगवे तें उगवून सांगितलें भाई । घालुनियां ताळा आतां शुद्ध राखा घाई

कोड़े अभंग ११

नुगवे तें उगवून सांगितलें भाई । घालुनियां ताळा आतां शुद्ध राखा घाई ॥१॥

आतां कांहीं नाहीं राहिलें । म्यां आपणा आपण पाहिलें ॥ध्रु.॥

कमाईस मोल येथें नका रीस मानू। निवडूं नये मज कोणा येथें वानूं ॥२॥

तुका म्हणे पदोपदीं कान्हो वनमाळी । जयेजत मग सेवटिला एक वेळीं ॥३॥

अर्थ :- भवांनो, तुम्हाला स्वताच्या बुद्धिने कोडे उलगड़ता आले नाही, ते मी उगडून सांगितले. आता अनुभवाशि ताळा घ्या व त्वरेने शुद्ध भाव ठेवा ।।1।।

मी आत्मरूप पाहिले. आता काही कर्तव्य राहिले नाही ।।ध्रु।।

मोक्षाची कमाई मोलाची आहे म्हणून मोक्षप्राप्तिचा कंटाळा करू नका. या ठिकाणी माला निर्णय घेता येत नाही. तुम्ही स्वता आपण बद्ध आहोत की मुक्त आहोत हे अनुभवावरुन ठरवा ।।2।।

तुकाराम महाराज म्हणतात, प्रत्येक वेळी वनमाळी श्रीकृष्णचे स्मरण करा. कधीतरी तुमचा विजय होईल आणि शेवटी त्याचे दर्शन तुम्हाला होईल ।।3।।.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा