शुक्रवार, ४ सप्टेंबर, २०१५

११५अझुनि कां थीर पोरा न म्हणसी किर । धरुनियां धीर लाजे बुर निघाला

खेळाचे अभंग ११५

अझुनि कां थीर पोरा न म्हणसी किर । धरुनियां धीर लाजे बुर निघाला ॥१॥

मोकळा होतासि कां रे पडिलासि डाई । वरिलांचा भार आतां उतरेसा नाहीं ॥ध्रु.॥

मेळवूनि मेळा एकाएकीं दिली मिठी । कवळिलें एक बहु बैसविलीं पाठीं ॥२॥

तळील तें वरी वरील तें येतें तळा । न सुटे तोंवरी येथें गुंतलिया खेळा ॥३॥

सांडितां ठाव पुढें सईल धरी हात । चढेल तो पडेल ऐसी ऐका रे मात ॥४॥

तुका म्हणे किती आवरावे हात पाय । न खेळावें तोंच बरें वरी न ये डाय ॥५॥

अर्थ :- अरे पोरा, संसाराजि अभिलाषा धरल्यामुळे अनेक जन्ममृत्युचे दुःख भोगलेस तरी अजुन 'कंटाळलो, वैतागलो असे म्हणत नाहीस. लोकलज्जेस्तव धैर्याने हे ओझे वाहतोस, सोसतोस. त्याने तू किती क्षीण झाला आहेस, थकेला आहेस, याचा विचार कर ।।1।।

तू अगोदर मुक्तअवसस्तेत होतास. विनाकारण या संसाराच्या मोहत का पडला आहेस? एकदा तुझ्या पाठीवर हा संसार बसला आहे, तो काही केल्या उतरणार नाही ।।ध्रु।।

पंचमहाभूतांचा मेळा भरवुन आत्म्याने आत्म्याला आत्मबुद्धिने कवटाळले; त्यामुळे विकाररूपि अनेक पोरे तुझ्या पाठीवर बसून कुरघोड़ी करू लागली आहेत ।।2।।

जोवर या संसाराच्या मोहत गुंतून पडलेले आहात तोपर्यंत पूण्य संपले की वरच अधोगतिला येणार आणि खालचे पुण्याच्या बळावर स्वर्गगति प्राप्त करणार ।।3।।

पूर्वपुण्याइने मनुष्य सत्ता, धन भोगन्याच्या उच्च स्तानि आरूढ़ झाला तरी पुन्यक्षयाने खाली येणार ।।4।।

तुकाराम महाराज म्हणतात, या मनाचे हातपाय किती आवरावे! म्हणून मझेपनाच्या मोहाने असे डाव खेळलेलेच बरे, म्हणजे डाव अंगावर येणार नाही ।।5।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा