शुक्रवार, २ डिसेंबर, २०१६

४६१सम सपाट वेसनकाट निःसंग जालें सौरी

४६१

सम सपाट वेसनकाट निःसंग जालें सौरी । कुडपीयेला देश आतां येऊं नेदीं दुसरी ॥१॥

गाऊं रघुरामा हें चि उरलें आम्हां । नाहीं जीवतमा वित्तगोतासहीत ॥ध्रु.॥

ठाव जाला रिता झाकुनि काय आतां । कोणासवें लाज कोण दुजा पाहता ॥२॥

सौरीयांचा संग आम्हां दुरावलें जग । भिन्न जालें सुख भाव पालटला रंग ॥३॥

लाज भय झणी नाहीं तजियेलीं दोन्ही । फिराविला वेष नव्हों कोणाचीं च कोणी ॥४॥

तुका म्हणे हा आम्हां वेष दिला जेणें । जनाप्रचित सवें असों एकपणें ॥५॥

अर्थ :- सर्व प्रकारची व्यसने सोडून देवून, सर्वसंगपरित्याग करून मी नि:संग होऊन सौरी झाले आहे. सर्व देश मीच ब्रह्मरुपाने व्यापून टाकले आहे. मी द्वेताला जवळ येऊ देत नाही. ॥१॥

 

आता रामाचे नाम गावे, इतकेच कर्तव्य उरले आहे. मला द्रव्याची, गोताचीच काय तर जिवाचीही परवा उरलेली नही ॥ध्रु.॥

 

हा देह आता रिकामा झाला आहे. आता व्स्राने झाकून काय कारचे आहे ? कोणाची लाज बाळगायची ? जगात देवाशिवाय दुसरे कोण आहे ? ॥२॥

 

सौर्याची संगत झाली आहे; त्यामुळे जगाशी संमंध उरला नाही. ऐक वेगळेच सुख लाभले आहे. देहाविषयी अहंकार नाहीसा होऊन कृतार्थतेचा रंग चढला आहे ॥३॥

 

आम्हाला लज्या-भय काही राहिले नाही. कारण आम्ही या दोन्ही गोष्टींचा त्याग केला आहे. आम्ही वेश बदललेला आहे. देहबुद्धी सोडून ब्रह्मबुद्धीचा स्वीकार केला आहे. आम्ही आता कोणाचेच कोणी राहिलो नाही ॥४॥

 

तुकाराम महाराज म्हणतात, ज्या भगवंताने आम्हाला हा वेश दिला, त्याच्या प्रचीतीने आम्ही जनात असूनही एकाकी असू ॥५॥

४६०सौरी सुर जालें दुर डौर घेतला हातीं

४६०

सौरी सुर जालें दुर डौर घेतला हातीं । माया मोह सांडवलें तीही लोकीं जालें सरती ॥१॥

चाल विठाबाई अवघी पांज देई । न धरीं गुज कांहीं वाळवंटीं सांपडतां ॥ध्रु.॥

हिंडोनि चौर्यांीशी घरें आलें तुझ्या दारा । एक्या रुक्यासाठीं आंचवलें संसारा ॥२॥

लाज मेली शंका गेली नाचों महाद्वारीं । भ्रांति सावलें फिटोनि गेलें आतां कैची उरी ॥३॥

जालें भांडी जगा सांडी नाहीं भीड चाड । घालीन चरणीं मिठी पुरविन जीविंचें तें कोड ॥४॥

तुका म्हणे रुका करी संसारतुटी । आतां तुम्हां आम्हां कैसी जाली जीवे साटीं ॥५॥
अर्थ :- मी हातात डमरू घेऊन साऱ्या सौर्यांमध्ये शूर सौरी झालो आहे. हरिनामाच्या आनंदात नाचत आहे. माया, मोह दूर झाल्यामुळे मी तिन्ही लोकांत श्रेष्ठ झालो आहे  ॥१॥

 

हे विठाबाई, तू वाळवंटात सापडलीस. सर्वांचे देह पंचमहाभूतात्मक आहेत. त्या माझ्या पंचमहाभूतात्मक देहात चल. काही गुपित पाळगु नको ॥ध्रु.॥

 

चौर्यांशी लक्ष योनी फिरलो. आता विठाई, मी तुज्या दारी आले आहे. तुझ्या भक्ती-प्रेमायापी संसाराचा त्याग केला ॥२॥

 

लाज नाहीशी झाली आणि कोणाचीही भीती राहिली नाही. भ्रांतीचे वस्त्र फेडून टाकून मी महाद्वारी नाचत आहे. आता काय उरले आहे ? ॥३॥

 

मला सर्वानी टाकले. मी भांडखोर बनले आहे. माला आता कोणाचीही गरज नाही, कसलीच भीड नाही. मी तुझ्या चरणांना मिठी मारली आहे. तू आता माझ्या मनाची इछ्या पूर्ण कर ॥४॥

 

तुकाराम महाराज म्हणतात, माला तुज्यामुळे नामरूपी रुका (पैसा) मिळाला आहे, म्हणजे आता संसार नाहीसा होईल. मग आता अशीतरी तुमची आमची गाठ घालू या ॥५॥

४५९सातें चला काजळ घाला तेल फणी करा


४५९

सातें चला काजळ घाला तेल फणी करा । दिवाणदारीं बैसले पारीं नाचों फेर धरा ॥१॥

या साहेबाचें जालें देणें वेळोवेळां न लगे येणें । आतां हाटीं काशासाठीं हिंडों पाटी दुकानें ॥ध्रु.॥

अवघ्या जणी मुंढा धणी नाचों एकें घाई । सरसावलें सुख कैसा चाळा एके ठायीं ॥२॥

तुका म्हणे वोळगों एका तोड चिंता माया । देऊं उद्गार आतां जाऊं मुळीचिया ठाया ॥३॥

अर्थ :- बायांनो, डोळ्यात ज्ञानाचे काजळ घाला. हरिविषयीच्या स्नेहाचे तेल लावा. पश्चात्तापाच्या फनीने अंत:करणातील सारे विकार विचारून काढा व बुद्धीची वेणी नित बांधा. आता पंढरीच्या परामार्थबाजारात नाचायला चला. आताच संतरूपी दिवाण घरी घेऊन गेले. ते पारावर बसले आह्रेत. त्यांच्यापुढे फेर धरून नाचूया ॥१॥

 

या साहेबांकडून आपण ज्ञानदानाचे कर्ज घेतलेले आहे, त्याच्या पुढे नाचून ते फेडून टाकू म्हणजे पुन्हा ते वेळोवेळी द्यायला नको. साहेब प्रसन्न होतील म्हणजे आपल्याला संसाराच्या बाजारात पाट्या घेऊन दुकाने फिरावी लागणार आहित ॥ध्रु.॥

 

आपण सार्याजनी आपला धनी जो पांडुरंग, त्याच्या समोर नाच करुया ! तेथे ऐक ठिकाणी सुख सामावले तर हा चाळा कशासाठी ? ॥२॥

 

तुकाराम महाराज म्हणतात, एकाची सेवा कारावी आणि माया तोडावी. त्याला साधून मुल ठिकाणी जाऊया ॥३॥

गुरुवार, १ डिसेंबर, २०१६

४५८मोकळी गुंते रिती कुंथे नाहीं भार दावें

४५८

मोकळी गुंते रिती कुंथे नाहीं भार दावें । धेडवाडा बैसली खोडा घेतली आपुल्या भावें ॥१॥

ऐका बाई लाज नाहीं आणिकां त्या गरतीची । समाधानीं उंच स्थानीं जाणे सेवा पतीची ॥ध्रु.॥

न बोलतां करी चिंता न मारिता पळे । दादला सेज नावडे निजे जगझोडीचे चाळे ॥२॥

देखत आंध बहिर कानीं बोल बोलतां मुकें । तुका म्हणे पतन सोयरीं ऐसीं जालीं एकें ॥३॥

अर्थ :- हा प्रापंचिक सौरी ( संसारी स्त्री ) दोराने बांधून न ठेवताच गुंतली आहे. डोक्यावर ओझे नसताना मोकळी असताना कुंथून, कण्हत आहे. देहरूपी वाड्याच्या खोड्यात आपल्या भावानुसार गुंतली आहे  ॥१॥

 

बायांनो, ऐका ! हि मुळात सुसंस्कृत, चांगल्या घराण्यातील स्त्री आहे. जी स्त्री आपल्या पतीची सेवा करते, ती उच्चस्तानी व समाधानी असते. अशा थोर स्त्रीला पाहून तुम्हाला लाज वाटत नाही काय ? ॥ध्रु.॥

 

कोणी काहीही बोलत नाही तरी हि सौरिणी स्त्री उगीचच चिंता करीत बसते. मारत नाही तरी पळून जाते. सुखरूपी हरी ह्र्द्यरुपी माहालात तिच्या शेजारी झोपलेला असतांना तो तिला आवडत नाही. चे सारे चाळे विषयाशी शिंदाळकी करण्याचे, जगझोडीचेच हललेले असतात ॥२॥

 

तुकाराम महाराज म्हणतात, हिला दृष्टी असूनही हरीचे रूप पाहताना हि आंधळी झाली आहे. कान असून बहिरी, तोंड असून मुकी झाली आहे. हरिभक्ती न करणार्या सौर्याचे अध:पतन झाले आहे ॥३॥

४५७टाक रुका चाल रांडे कां गे केली गोवी

४५७

टाक रुका चाल रांडे कां गे केली गोवी । पुसोनियां आलें ठाव म्हणोनि देतें सिवी ॥१॥

आतां येणें छंदें नाचों विनोदें । नाहीं या गोविंदें माझें मजसी केलें ॥ध्रु.॥

कोरडे ते बोल कांगे वेचितेसी वांयां । वर्ते करूनि दावीं तुझ्या मुळीचिया ठाया ॥२॥

याजसाठीं म्या डौर धरियेला हातीं । तुका म्हणे तुम्हा गांठी सोडायाची खंती ॥३॥
अर्थ :- ऐक संत सौरीस म्हणते, पैसा टाक. अशी प्रपंचात का गुतून राहिलीस ? भाजनानंदात माज्याबरोबर नाचायला चाल. आत्म्याचे स्वरूप कसे असते ते मी गुरूला विचारून जाणून घेतले आहे आणि म्हणूनच तुला शिव्या देत आहे ॥१॥

 

आपण या छंदात मनसोक्त नाचू. गोविंदाने माला माझे केले आहे. (आत्मस्वरूप दाखवीले आहे) ॥ध्रु.॥

 

अग, हे पोकळ शब्द का वाया घालवतेस ? तुझे मुल ठिकाण मिळवून दाखव आणि तेथे जाऊन रहा ॥२॥

 

तुकाराम महाराज म्हणतात, देहाविशायाची अभिमानाची गाठ सोडवण्यासाठी तुम्ही काळजी घ्या, सावध असा, हे सांगण्यासाठी हा उपदेरुपी डमरू हातात घेतला आहे ॥३॥

४५६आणिकां उपदेशूं नेणें नाचों आपण

४५६

आणिकां उपदेशूं नेणें नाचों आपण । मुंढा वांयां मारगेली वांयां हांसे जन ॥१॥

तैसा नव्हे चाळा आवरीं मन डोळा । पुढिलांच्या कळा कवतुक जाणोनी ॥ध्रु.॥

बाहिरल्या वेषें आंत जसें तसें । झाकलें तों बरें पोट भरे तेणें मिसें ॥२॥

तुका म्हणे केला तरी करीं शुद्ध भाव । नाहीं तरी जासी वांयां हा ना तोसा ठाव ॥३॥

अर्थ :- दुसऱ्यांना उपदेश करतो, परंतु त्या प्रमाणे नाचण्याचे आपल्याला काळात नाही. त्यामुळे त्याचे मुंडण व्यर्थ जाते. लोक त्याला हसतात ॥१॥

 

इतराना उपदेश करू नकोस. इतर चाले करू नकोस. परस्त्री, परक्याचे धन यांचा लोभ ठेऊ नकोस. पूर्वी होऊन गेलेल्या संतरूपी सौर्यांचे कौशल्य घे आणि तसे नाचत जा ॥ध्रु.॥

 

बाहेरून सौरीचा वेश घेतला; परंतु अंत:करणात काम, क्रोध बाळगले तर त्याचा काय उपयोग ? तुमचे अंतरंग जोवर झाकले आहे, तोवर ठीक आहे. ते उघडकीस आले कि लोह हसतील. अश्या बाह्य वेषाने  फार तर तुमचे पोट भरेल, पण तुम्हाला कृतार्थ होऊ शकत नाही ॥२॥

 

तुकाराम महाराज म्हणतात, ठेवायचा असेल तर पांडुरंग चरणी शुद्ध भाव ठेवा; नाहीतर दांभिकपणामुळे देव नाही व संसारही नाही, अशी गत होईल ॥३॥

४५५वेसन गेलें निष्काम जालें नर नव्हे नारी

सौर्यान - अभंग ११

४५५

वेसन गेलें निष्काम जालें नर नव्हे नारी । आपल्या तुटी पारख्या भेटी सौरियांचे फेरी ॥१॥

त्याचा वेध लागला छंद हरि गोविंद वेळोवेळां । आपुलेमागें हासत रागें सावलें घालिती गळां ॥ध्रु.॥

जन वेषा भीतें तोंडा आमुच्या भांडपणा । कर कटीं भीमा तटीं पंढरीचा राणा ॥२॥

वेगळ्या याति पडिलों खंतीं अवघ्या एका भावें । टाकियेली चाड देहभाव जीवें शिवें ॥३॥

सकळांमधीं आगळी बुद्धि तिची करूं सेवा । वाय तुंबामूढासवें भक्ति नाचों भावा ॥४॥

म्हणे तुका टाक रुका नाचों निर्लज्जा । बहु जालें सुख काम चुकलों या काजा ॥५॥

अर्थ :- प्रपंच्याचे बंधन न राहिल्यामुळे मी निशाकाम झालो. मी स्त्रीही नाही. पुरुषही नाही अशी तृतीय प्रकृती आहे. मी घरादाराचा संबंध तोडला व परपुरुषाची भेट घेतली. संतारूपी वैरीनीच्या समाजात राहू लागलो ॥१॥

 

त्या पुरुषाचा मला छंद लागला आहे. दर वेळी हरी, गोविंद अशी नामे घेण्याची गोडी लागली आहे. काही लोक आम्हाला हसतात, तर काही आमच्यावर रागावतात. कारण आम्ही लुगडे नेसतो, खांद्यावर पदर घेतो ॥ध्रु.॥

 

आमचा वेश पाहून लोक घाबरतात. माझ्या भांखोर स्वभावामुळे माझ्याशी बोलत नाहीत. भीमेच्या तीरावर कमरेवर हात ठेऊन आमचा पती, पंढरीराणा उभा आहे ॥२॥

 

एका भाव धरून आम्ही जातीतून वेगळ्या झालो. चिंता दूर झाली. जीव-शिव याचे ऐक्य झाल्यामुळे देहाभावाची चाड सोडून दिली ॥३॥

 

देहबुद्धी आणि जीवबुद्धी याहून ब्रह्मबुद्धि श्रेष्ठ आहे. आम्ही तिची सेवा करू आणि सर्व व्यर्थ आहे, हे लक्षात घेवून आमच्या धन्याबरोबर भक्तीभावाने नाचू ॥४॥

 

तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही निर्लज्य होऊन धुंदपणे नाचू. आता खूप सुख झाले, सारे काम संपले ॥५॥

४५४आहा रे भाई । गंगा नव्हे जळ

४५४

आहा रे भाई । गंगा नव्हे जळ । वृक्ष नव्हे वड पिंपळ । तुळसी रुद्राक्ष नव्हे माळ । श्रेष्ठ तनु देवाचिया ॥१॥

समुद्र नदी नव्हे पैं गा । पाषाण म्हणों नये लिंगा । संत नव्हती जगा । मानसा त्या सारिखे ॥२॥

काठी म्हणों नये वेतु । अन्न म्हणों नये सांतु । राम राम हे मातु । नये म्हणों शब्द हे ॥३॥

चंद्र सूर्य नव्हती तारांगणें । मेरु तो नव्हे पर्वता समान । शेष वासुकी नव्हे सर्प जाण । विखाराच्या सारिखे ॥४॥

गरुड नव्हे पाखरूं । ढोर नव्हे नंदिकेश्वरू । झाड नव्हे कल्पतरू । कामधेनु गाय न म्हणावी ॥५॥

कूर्म नव्हे कासव । डुकर नव्हे वराह । ब्रम्हा नव्हे जीव । स्त्री नव्हे लक्ष्मी ॥६॥

गवाक्ष नव्हे हाड । पाटाव नव्हे कापड । परीस नव्हे दगड । सगुण ते ईश्वरीचे ॥७॥

सोनें नव्हे धातु । मीठ नव्हे रेतु । नाहीं नाहीं चर्मांतु । कृष्णजिन व्याघ्रांबर ॥८॥

मुक्ताफळें नव्हेति गारा । खड्याऐसा नव्हे हिरा । जीव नव्हे सोइरा । बोळवीजे स्वइच्छेनें ॥९॥

गांव नव्हे द्वारावती । रणसोड नव्हे मूर्ति । तीर्थ नव्हे गोमती । मोक्ष घडे दर्शनें ॥१०॥

कृष्ण नव्हे भोगी । शंकर नव्हे जोगी । तुका पांडुरंगीं । हा प्रसाद लाधला ॥११॥

अर्थ :- बंधुंनो, गंगाजल हे इतर पाण्यासारखे नसते. वड-पिपळ हे इतर वृक्षा सारखे नसतात. इतर मालेसारखे वृद्राक्ष नसते. हे सारे श्रेष्ठ आहेत. त्या भगवंताच्या प्रतिमा आहेत ॥१॥

 

समुद्र म्हणजे नधी नव्हे. शिवलिंगाला पाषाण म्हणू नये. जगातील इतर माणसांसारखे संत नसतात ॥ध्रु.॥

 

वेळूची काठी इतर काठ्यासारखी समजू नये. सातुला समान्य अन्न म्हणू नये. ‘राम’ हा शब्द इतर शब्दांसारखा समजू नये. ॥२॥

 

गरुड हा सामान्य पक्षी नाही. नांदी हा सामान्य बैल नाही. कल्पतरू हे सामान्य झाड नाही ॥३॥

 

चंद्र, सूर्य हे इतर तारांगण नव्हे. मेरू पर्वत हा इतर पावतांसाराखा समजू नये. शेष, वासुकी हे अन्य विषारी सापासारखे नाहीत ॥४॥

 

वराह अवताराला डुक्कर मानू नये. ब्रह्मदेव हा सामान्य जीव नव्हे. लक्ष्मी हि सर्वसामान्य स्त्री नव्हे ॥५॥

 

गवाक्ष हे साधे झाड नाही. वस्त्र हे कातडे नाही. परीस हा साधा दगड नाही.ते ईश्वराचे सगुण अंश आहेत ॥६॥

 

सोने हा सामान्य धातू नाही. मीठ म्हणजे रेती नाही. कृष्णाजिन-व्याघ्राबर हि नुसती चामडी नाहीत ॥७॥

 

मुक्ताफळे म्हणजे गारा नव्हेत. हिरा हा खडा नाही. स्वत:च्या इच्येनुसार बोलविता येईल असा जीव हा सोयरा नाही ॥८॥

 

द्वारका हे साधे गाव नाही. रणछोड हि इतर मुर्तीसारखी नाही. गोमती हे सामान्य तीर्थ नाही. कारण या सर्वांच्या दर्शनामुळे चित्तशुद्धी होऊन मोक्ष प्राप्त होतो ॥९॥

 

तुकाराम महाराज म्हणतात, कृष्ण हा भोगी नाही. शंकर हा जोगी नाही. हा प्रसाद मला (तुकाराम महाराजांना) पान्दुरांगाजवळ मिळालेला आहे ॥१०॥

४५३आहा रे भाई । तयावरी माझी ब्रीदावळी

४५३

आहा रे भाई । तयावरी माझी ब्रीदावळी । भ्रष्ट ये कळी क्रियाहीन ॥१॥

थुंका थुंका रे त्याच्या तोंडावरी । वाणिली ते थोरी दवडा वांयां बाहेरी ॥ध्रु.॥

बाइलेचा दास पित्रांस उदास । भीक भिकार्याीस नये दारा ॥२॥

विद्याबळें वाद सांगोनियां छळी । आणिकांसि फळी मांडोनियां ॥३॥

गांविंचिया देवा नाहीं दंडवत । ब्राम्हण अतीत घडे चि ना ॥४॥

सदा सर्वकाळ करितो चि निंदा । स्वप्नीं ही गोविंदा आठवीना ॥५॥

खासेमध्यें धन पोटासि बंधन । नेणें ऐसा दानधर्म कांहीं ॥६॥

तुका म्हणे नटे दावुनियां सोंग । लवों नेदी अंग भक्तिभावें ॥७॥

अर्थ :- बंधुंनो, या कलीयुगात जे आचारभ्रष्ट, क्रियाहीन आहेत त्यांची फजिती करणे हे माझे कार्य आहे ॥१॥

 

त्यांच्या तोंडावर थुंका. जे आपले महत्व स्वत:च सांगत बसतात, त्यांना बाहेर हाकला ॥ध्रु.॥

 

जो बायकांचा दास होऊन आईबापाचा त्याग करतो, भिकार्याला भीक वाढण्यासाठी दाराबाहेर येत नाही ॥२॥

 

विध्येच्या बळावर इतरांशी वाद घालतो व तांना त्रास देतो ॥३॥

 

गावातील देवांच्या दर्शनाला कधी जात नाही, अतिथी, ब्रह्मान याना जेऊ घालणे त्याला कधी शक्य होत नाही ॥४॥

 

नेहमी संतसज्जनांची निंदा करतो, स्वप्नातही गोविंदाचे भजन करीत नाही ॥५॥

 

मिळालेले धन जमिनीत पुरून ठेवतो व स्वत:च्या पोटाला उपाशी मारतो. दानधर्म कसा असतो, हे तर त्याला माहीतच नसते ॥६॥

 

तुकाराम महाराज म्हणतात, भक्तीचे सोंग घेऊन जो गळ्यात माला घालतो, चंदनाचा तिला लाऊन जो नटतो, परंतु गुरु, संत, देव यांच्यासमोर नम्र होत नाही, त्याच्या तोंडावर थुंका ॥७॥

४५२आहा रे भाई । नमो उदासीन जाले देहभावा

कावडे

गाथा अभंग ४५२

आहा रे भाई । नमो उदासीन जाले देहभावा । आळविती देवा तया नमो ॥१॥

नमो तीर्थपंथें चालती तयांसी । येती त्यांसी बोळविती त्यां नमो ॥२॥

नमो तयां संतवचनीं विश्वास । नमो भावें दास्य गुरुचें त्यां ॥३॥

नमो तया मातापित्यांचें पाळण । नमो त्या वचन सत्य वदे ॥४॥

नमो तया जाणे आणिकाचें सुखदुःख । राखे तान भुक तया नमो ॥५॥

परोपकारी नमो पुण्यवंता । नमो त्या दमित्या इंद्रियांसि ॥६॥

तुका म्हणे नमो हरिचिया दासा । तेथें सर्व इच्छा पुरलीसे ॥७॥
 

अर्थ :- देहावरील अहंता सोडून जे उदासीन झाले आहे, त्यांना मी नमन करतो. जे देवाला आळवित, त्यांना मी नमन करतो ॥१॥

 

तीर्थक्षेत्री जाणाऱ्यांना माझा नमस्कार असो ॥ध्रु.॥

 

जे संतवचनांवर विश्वास ठेवतात, ज्यांनी गुरुचे दास्यत्व पत्कारले आहे, त्यांना नमन असो ॥२॥

 

जे मात्या-पित्यांचे आज्ञांचे पालन करतात, जे सत्यभाशी आहेत, त्यांना वंदन असो ॥३॥

 

उताराचे सुखदु:ख जे जाणतात, दुसर्याच्या ताहान-भुकेची ज्याना जाणीव असते, त्यांना वंदन असो ॥४॥

 

जो परोपकारी, पुण्यवंत आहे, ज्यांच्या इंद्रीयांवारती ताबा आहे, त्यांना माझा नमस्कार असो ॥५॥

 

तुकाराम महाराज म्हणतात, हरीच्या दासांना माझा नमस्कार असो. त्यांच्या सहवासात सर्व इच्छया पूर्ण होत असतात ॥६॥

 

४५१आहा आहा रे भाई

४५१

आहा आहा रे भाई । हें अन्नदानाचें सत्र ।

पव्हे घातली सर्वत्र । पंथीं अवघे पंथ मात्र । इच्छाभोजनाचें आर्त पुरवावया ॥१॥

यावें तेणें घ्यावें । न सरेसें केलें सदाशिवें ।

पात्र शुद्ध पाहिजे बरवें । मंगळभावें सकळ हरि म्हणा रे ॥२॥

नव्हे हें कांहीं मोकळें । साक्षी चौघांचिया वेगळें ।

नेदी नाचों मताचिया बळें । अणु अणोरणीया आगळें । महदि महदा साक्षित्वें हरि म्हणा रे ॥३॥

हे हरि नामाची आंबिली । जगा पोटभरी केली ।

विश्रांति कल्पतरूची साउली । सकळां वर्णां सेवितां भली । म्हणा हर हर महादेव ॥४॥

तुका हरिदास तराळ । अवघे हाकारी सकळ ।

या रे वंदूं शिखरातळ । चैत्रमास पर्वकाळ महादेवदर्शनें ॥५॥

अर्थ :- अरे बंधुंनो, सत्प्रवृत्तीने चालणार्या यातेरेकारुंना द्नानाचे भोजन देण्यासाठी हे सत्र घातले आहे. सर्व मार्ग या मार्गाला येऊन मिळतात. सर्वांचे मनोरथ पुरविण्यासाठी हे इच्याभोजन घातले आहे ॥१॥

 

जे कोणी येथे येतील ते तृप्त होतील. हे कधीही न संपणारे असे भोजन घातले आहे. मात्र, सोबत घेतलेले पत्र शुद्ध असले पाहिजे. मनात मंगल्भावाना धरून ‘हरी’ म्हणा रे ! ॥ध्रु.॥

 

हे वाया जाणार नाही. नाम हे उपयुक्त आहे.चार वेदांचे साक्षित्व त्यास आहे. म्हणून सर्वांनी हरिनामाचा उच्चार करावा ॥२॥

 

सर्व जगाला पोटभर पुरेल इतकी हि हरिनामाची आंबील केली आहे. क्ल्पतारुच्या सावलीखाली ती विश्रांती आहे. सर्व वर्नांनासेवान करण्या इतकी चांगली आहे. अरे, ‘हर हर महादेव’ म्हणा रे ! ॥३॥

 

तुकाराम महाराज म्हणतात, मी दंडवत देणारा तराळ. हरिदास आहे. सर्वांना बोलावीत आहे. आपण शिखर-शिंगणापूरला जाऊन चैत्रमासातील पर्वणीच्या वेळी महादेवाचे दर्शन घेऊ ॥४॥

४५०आहा रे भाई । प्रथम नमूं तो विनायक

कावडे - अभंग ५

४५०

आहा रे भाई । प्रथम नमूं तो विनायक ।

ठेवुनि गुरुचरणीं मस्तक । वदेल प्रसादिक वाणी । हरिहरांचे पवाडे ॥१॥

माझी ऐसी ब्रीदावळी । दासें दासत्वें आगळी ।

पान्हेरीनें मार्ग मळी । जीवन घ्या रे कापडि हो ॥२॥

जें या सीतळाहुनि सीतळ । पातळाहुनि जें पातळ ।

प्रेमामृत रसाळ । तें हें सेवा अहो भाग्याचे ॥३॥

जिंकाल तरी जिंका रे अभिमान । दवडाल तरी दवडा लज्जा आणि मान ।

धराल ते धरा शंभूचे चरण । दावाल पण ऐसा दावा तो ॥४॥

काळा घेऊं नेदीं वाव । आला तो राखें घावडाव ।

शुद्ध सत्वीं राखोनि भाव । म्हणा महादेव हरिहर वाणी गर्जो द्या ॥५॥

पराविया नारी माउली समान । परधनीं बाटों नेदीं मन ।

जीवित्व तें तृणासमान । स्वामिकाजीं जाण शूर म्हणों तया ॥६॥

शक्ति वेचाविया परउपकारा । खोटें खोट्याचा पसारा ।

सत्य तें भवनदीचा तारा । आळस तो न करा येथे अहो सांगतों ॥७॥

व्रत करा एकादशी सोमवार । कथा पूजन हरिजागर ।

पुण्य तें असे गातां नाचतां बहु फार । पुन्हा बोलिला संसार नाहीं नाहीं सत्यत्वें ॥८॥

संग संतांचा करितां बरवा । उत्तमोत्तम कीर्तीचा ठेवा ।

पंथ तो सुपंथें चालावा । उगवा वासना लिगाड ॥९॥

तुका चालवितो कावडी । प्रवृत्ति निवृत्ति चोखडी ।

पुढती पुढती अधिक गोडी । भरुनि कळस भजन आवडी केशवदास नटतसे ॥१०॥

अर्थ :- भाइंनो, प्रथम गणरायाला नमन करू. श्री गुरुचारानावर मस्तक ठेऊ. त्यांच्या कृपा प्रसादाने मुखातून प्रासादिक वाणी बाहेर पडेल. हरिहरांचे पोवाडे गाउ ॥१॥

 

असे सेवाकत्व करण्यासाठी माझी ब्रीदावळी प्रसिद्ध आहे. मी पूर्वपरंपरेच्या मार्गावरून जात आहे. ते नामाजीवन साधकाने प्राशन करावे ॥ध्रु.॥

 

साधकहो, ते नाम शितालाहून शीतल, पातळापेक्षा पातळ, रसपूर्वक असे प्रेमामृत आहे. त्याचे सेवन करा ॥२॥

 

जिंकायचे असेल तर अभिमान जिंका, दवाडायाचे तर मान, लज्जा दवडा. अंत:करणात शांभूमाहादेवाचे ध्यान करा. दाखवायचा असेल तर निश्चय असा दाखवा ॥३॥

 

भविष्यात निवांतपणे परमार्थाचा मार्ग अवलंबू, असे म्हणाल तर तो काल तुम्हाला थाबु देणार नाही. निंदा-नालस्तीचे जे काही घाव तुमच्यावर बसतील ते सारे सहन करा. विठ्ठल चरणावर शुद्ध भाव ठेवा. मुखाने ‘हरहर महादेव’ अशी गर्जना करा ॥४॥

 

परस्त्री मातेसमान मानून, परद्राव्यहि त्याज्य माना. स्वामींची सेवा करतांना आपला जीव तृनवत मानून जो खर्च करतो, त्यालाच शूर वीर मानावे ॥५॥

 

शरीरातील बळ परोपकारासाठी खर्च करावे. प्रपंच्याचा हा पसारा खोटा आहे हे लक्षात घ्या. भावनादीतून तरुण जाणे हे सत्य आहे. येथे आला आहात, तेव्हा त्याचा कंटाळा करू नका, असे मी सांगत आहे ॥६॥

 

एकादशी सोमवार व्रत करा. कथा, पूजन, हरिजागरण करा. देवाचे नाव घेण्याने,

नामछंदात नाचान्याने मोठे पुण्य मिळते. त्यांना पुन्हा जन्मास येऊन संसारात पडावे लागत नाही, हे मी सत्य सांगत आहे ॥७॥

 

संतसंगत करणे चांगले, असे करणार्याना उत्तम कीर्ती प्राप्त होते. वासनेचे लिगाड सोडून सुपंथ चालवा ॥८॥

 

तुकाराम महाराज म्हणतात, प्रवृत्ती-निवृत्तीची शुद्ध कावड मी चालविली आहे. आवडीने भजनाचे कलश भरून घेतले आहेत. त्यात पुध्ये अधिकाधिक रुची झाली आहे. केशवदास म्हणून मी नटत आहे ॥९॥