सोमवार, ७ डिसेंबर, २०१५

३२६पुण्यवंत व्हावें । घेतां सज्जनांची नांवें

गाथा अभंग ३२६

पुण्यवंत व्हावें । घेतां सज्जनांची नांवें ॥१॥

नेघे माझे वाचे तुटी । महा लाभ फुकासाठी ॥ध्रु.॥

विश्रांतीचा ठाव । पायीं संतांचिया भाव ॥२॥

तुका म्हणे जपें । संतांचिया जाती पापें ॥३॥

अर्थ :- संतसज्जनांची फक्त नावे उच्चारल्याने पुण्यसंचय होतो ।।1।।

त्यामुळे माझी वाणी पुण्यसंचय करुण घेणार आहे, हां लाभ दवडण्यास ती तयारी नाही ।।ध्रु।।

संतचरणाजवळ जीवाला विसावा मिळतो ।।2।।

तुकोबा म्हणतात, अश्या प्रकारचे संतांच्या नामस्मरामुळे पाप नाहीसे होते ।।3।।

३२५गहूं एकजाती । परी त्या पाधाणी नासिती

गाथा अभंग ३२५

गहूं एकजाती । परी त्या पाधाणी नासिती ॥१॥

वर्म जाणावें तें सार । कोठें काय थोडें फार ॥ध्रु.॥

कमाईच्या सारें । जाति दाविती प्रकार ॥२॥

तुका म्हणे मोल । गुणा मिथ्या फिके बोल ॥३॥

अर्थ :- गवहाचे अनेक खाद्य प्रकार तयार करता येतात ।।1।।

स्वयंपाक करणारी जर सुगरण नसेल तर ती गव्हाचा नास करेल ।।ध्रु।।

म्हणून ज्या ज्या पदार्थाचे गुणधर्म ओळखून कुशलतेने त्याचा उपयोग करून घ्यावा ।।2।।

तुकोबा म्हणतात, की प्रत्येकातील गुणाला महत्त्व दिल पाहिजे, तेथे नुसती बड़बड़ उपयोगाची नाही ।।3।।

सोमवार, ३० नोव्हेंबर, २०१५

३२४तुझें वर्म ठावें । माझ्या पाडियेलें भावें

गाथा अभंग ३२४

तुझें वर्म ठावें । माझ्या पाडियेलें भावें ॥१॥

रूप कासवाचे परी । धरुनि राहेन अंतरीं ॥ध्रु.॥

नेदी होऊं तुटी । मेळवीन दृष्टादृष्टी ॥२॥

तुका म्हणे देवा । चिंतन ते तुझी सेवा ॥३॥

अर्थ :- माझ्या भक्तिभावामुळे तुझे रूप, रहस्य मला सापडले आहे ।।1।।

कासव जैसे आपले आवयव पोटाशी आवळून घेतो, तसे तुझे रूप मी वृदयाशि धरले आहे ।।ध्रु।।

या आपल्या नात्यामध्ये आता दुरावा निर्माण होणार नाही. तुझ्या दृष्टिशी माझी दृष्टी एकरूप होईल ।।2।।

तुकोबा म्हणतात, आता यापुढे तझे चिंतन आणि सेवा हेच माझे जीवन, हेच सत्य आहे ।।3।।

३२२कृपा करुनी देवा । मज साच तें दाखवा

गाथा अभंग ३२२

कृपा करुनी देवा । मज साच तें दाखवा ॥१॥

तुम्ही दयावंत कैसे । कीर्ति जगामाजी वसे ॥ध्रु.॥

पाहोनियां डोळां । हातीं ओढवाल काळा ॥२॥

तुका म्हणे देवा । माझा करावा कुठावा ॥३॥

अर्थ :- हे देवा, तुमची माझी जन्मा आधिपासूनचि ओळख आहे; ती तुम्ही सहजपणे विसराल ।।1।।

तर तुमच्या इनामाला बट्टा लागेल आणि माझेही नुकसान होईल ।।ध्रु।।

एखाद्याजवळ विश्वासाने संभाळन्यास दिलेला ठेवा त्याने अभिलाशेने बुडवावा, त्या प्रमाणे तुमचे वर्तन ठरेल ।।2।।

हे दातारा, माझी ओळख विसरु नका, असे तुकोबा म्हणतात ।।3।।

३२१दाता नारायण । स्वयें भोगिता आपण

गाथा अभंग ३२१

दाता नारायण । स्वयें भोगिता आपण ॥१॥

आतां काय उरलें वाचे । पुढें शब्द बोलायाचे ॥ध्रु.॥

देखती जे डोळे । रूप आपुलें तें खेळे ॥२॥

तुका म्हणे नाद । जाला अवघा गोविंद ॥३॥

अर्थ :- मनुष्याला सर्व सुख देणारा नारायन आहे आणि उपभोगनाराहि तोच आहे ।।1।।

त्यामुळे माणसाला बोलायला पुढे जागाच् राहिली नाही ।।ध्रु।।

आपले डोळे, त्या डोळ्यांना दिसनारे रूप सर्व काही तोच आहे ।।2।।

तुकोबा म्हणतात, मुखातून निघनारे शब्द आणि ते शब्द श्रवण करणारे कान, शब्दांचा नाद सर्व काही गोविंदच आहे ।।3।।

३२०बरा कुणबी केलों । नाहीं तरि दंभेंचि असतों मेलों

गाथा अभंग ३२०

बरा कुणबी केलों । नाहीं तरि दंभेंचि असतों मेलों ॥१॥

भलें केलें देवराया । नाचे तुका लागे पायां ॥ध्रु.॥

विद्या असती कांहीं । तरी पडतों अपायीं ॥२॥

सेवा चुकतों संताची । नागवण हे फुकाची ॥३॥

गर्व होता ताठा । जातों यमपंथें वाटा ॥४॥

तुका म्हणे थोरपणें । नरक होती अभिमानें ॥५॥

अर्थ :- बारे झाले देवा, तू मला कुनबी मातीत जन्माला घातलेस, नाहीतर मी उच्च जातीच्या गर्वाने मेलो असतो ।।1।।

थोर केले नाहीस हे बारे झाले, आता मी तुझ्या पायाशि नाचू शकतो ।।ध्रु।।

माझ्याजवाल कोणतीही विद्या असती तर माला अहंकार झाला असता ।।2।।

तय अहंकारामुळे माझ्या हातून संतासेवा घडली नसती आणि हां नरदेह वाया गेला असता ।।3।।

त्या विध्येच्या अहंकाराने माझ्या अंगी गर्व, ताठा आला असता; त्यामुळे मी यमाच्या घराची वाट चालु लागलो असतो ।।4।।

तुकोबा म्हणतात, थोरापनामुळे अभिमान, अहंकार निर्माण होतो आणि मनुष्य अंती नरकात जातो ।।5।।

#रामकृष्णहरि_विठ्ठल_केशवा

३१९बोलावें तें धर्मा मिळे । बरे डोळे उघडूनि

गाथा अभंग ३१९

बोलावें तें धर्मा मिळे । बरे डोळे उघडूनि ॥१॥

काशासाठीं खावें शेण । जेणें जन थुंकी तें ॥ध्रु.॥

दुजें ऐसें काय बळी । जें या जाळी अग्नीसि ॥२॥

तुका म्हणे शूर रणीं । गांढें मनीं बुरबुरी ॥३॥

अर्थ :- बोलताना दोळसपनाने, धर्मसंकेतानुसार बोलावे ।।1।।

बोलू नये ते जर बोललो तर लोक आपल्यावर थुंकतील ।।ध्रु।।

आपण इतके बलवान आहोत का की या समाजपुरुषाला जाळु ? ।।2।।

तुकोबा म्हणतात, शुर मनुष्य राणांगनावर शस्त्रसज्ज होऊन उभा राहतो, तर भित्रा मनुष्य घरात नुसत्या बढ़ाया मारतो ।।3।।

३१८उजळावया आलों वाटा । खरा खोटा निवाड

गाथा अभंग ३१८

उजळावया आलों वाटा । खरा खोटा निवाड ॥१॥

बोलविले बोल बोलें । धनीविठ्ठला सन्निध ॥ध्रु.॥

तरी मनीं नाहीं शंका । बळें एका स्वामीच्या ॥२॥

तुका म्हणे नये आम्हां । पुढें कामा गबाळ ॥३॥

अर्थ :- मी प्रपंच्याकडून परमारथाकडे जाणारी वाट उजळविन्यासाठी व सत्य-असत्य संगन्यासाठी आलो आहे ।।1।।

माझा बोलविता धनी तो विठ्ठल आहे. तो जसे बोलवितो, तसे मी बोलतो ।।ध्रु।।

त्यामुळे माझ्या विठोबाच्या सल्यानुसार असणाऱ्या माझ्या बोलाविषयी तुम्ही शंका घेऊ नाका ।।2।।

तुकोबा म्हणतात, की हरिभक्तांमध्ये अडथळा आणणारी साधने आम्हाला चालानार नाही ।।3।।

३१७येथीचिया अळंकारें । काय खरें पूजन

गाथा अभंग ३१७

येथीचिया अळंकारें । काय खरें पूजन ॥१॥

वैकुंठींच्या लावूं वाटा । सर्व साटा ते ठायीं ॥ध्रु.॥

येथीचिया नाशवंतें । काय रितें चाळवूं ॥२॥

तुका म्हणे वैष्णव जेन । माझे गण समुदाय ॥३॥

अर्थ :- पृथवितलावरील क्षणभंगुर अलंकाराणे केलेले पूजन हे खरे पूजन नव्हे ।।1।।

खरे पूजन करण्यासाठी वैकुंठाचा मार्ग चालावा लागतो, तेथे शास्वत सुखाचा भांडार मिलते ।।ध्रु।।

इहलोकातील सर्व सूखे अशाश्वत आहेत; त्यासाठी मी तुम्हाला त्याचा मोहत पाडत नाही ।।2।।

तुकोबा म्हणतात, वैकुंठाचा मार्ग चालविनारे वैष्णव हेच माझे खरे सोबती आहेत ।।3।।

३१६विधीनें सेवन । विषयत्यागातें समान

गाथा अभंग ३१६

विधीनें सेवन । विषयत्यागातें समान ॥१॥

मुख्य धर्म देव चित्तीं । आदि अवसान अंतीं ॥ध्रु.॥

बहु अतिशय खोटा । तर्कें होती बहु वाटा ॥२॥

तुका म्हणे भावें । कृपा करीजेते देवें ॥३॥

अर्थ :- शास्त्रार्थाचे सेवन योग्य त्या विधिने केले तर ते विषय त्यागासमान आहेत ।।1।।

जन्मापासून अंतापर्यंत हरिचे नामस्मरण हाच मानवजन्माचा धार आहे ।।ध्रु।।

भक्तिमार्गाचा तर्क काढत गेल्यास अनेक वाता फुटतील ।।2।।

तुकोबा म्हणतात, म्हणून मनुष्याने परमेस्वरावर श्र्द्धा ठेवली तर तो त्याचे कल्याण करील ।।3।।

३१५वेदाचें गव्हर न कळे पाठकां

गाथा अभंग ३१५

वेदाचें गव्हर न कळे पाठकां । अधिकार लोकां नाहीं येरां ॥१॥

विठोबाचें नाम सुलभ सोपारें । तारी एक सरे भवसिंधु ॥ध्रु.॥

जाणत्या असाध्य मंत्र तंत्र काळ । येर तो सकळ मूढ लोक ॥२॥

तुका म्हणे विधि निषेध लोपला । उच्छेद या जाला मारगाचा ॥३॥

अर्थ :- वेदपथं करणाऱ्या सर्व पंडिताना वेदाचा सार कळतेच अस नाही, इतराना वेद पाठनाचा अधिकार नसल्यामुळे त्यांना वेदाचे सार काळण्याचा संबंधच येत नाही ।।1।।

विठ्ठलाचे नाम हे सुलभ-सोपे आहे, भवसागर पर करणारे आहे, ते घेण्याचा अधिकार सर्वाना आहे ।।ध्रु।।

मंत्रतंत्र जानाणाऱ्या जानाकारांना कर्मकांड परिपुर्नरीत्या साध्य होत नाही, तर इतराना कसे समजनर ? ।।2।।

तुकोबा म्हणतात, वेदांमधील विधिनीशेष लोप पावल्यामुळे हां मार्ग खुंटला आहे, त्यामुळे कलियुगात नामभक्तीवीना दूसरा पर्याय नाही ।।3।।

३१४इनामाची भरली पेठ । वाहाती दाट मारग

गाथा अभंग ३१४

इनामाची भरली पेठ । वाहाती दाट मारग ॥१॥

अवघेची येती वाण । अवघे शकुन लाभाचे ॥ध्रु.॥

अडचणी त्या केल्या दुरी । देण्या उरी घेण्याच्या ॥२॥

तुका म्हणे जोडी जाली । ते आपुली आपणा ॥३॥

अर्थ :- पंढरी क्षेत्र ही भक्तांच्या इनामदारीची पेठ आहे, त्याचे सर्व मार्ग भक्तानि भरून वाहत आहेत ।।1।।

मानवी जीवनाचे सार्थक करणारे चारि पुरुषार्थ स्वरुप या पेठेत विकावयास आले आहेत, त्याचा लाभ होण्याचे शुभ शकुन होत आहेत ।।ध्रु।।

या पेठेतील व्यापार्याच्या सर्व समश्या दूर झाल्याने देने-घेणे सहजसोपे झाले आहे ।।2।।

तुकाराम महाराज महाजतात, या पेठेत् येणाऱ्या भक्तानां आत्मज्ञान स्वरूपाचा लाभ होतो ।।3।।

३१३करवितां व्रत अर्धे पुण्य लाभे

गाथा अभंग ३१३

करवितां व्रत अर्धे पुण्य लाभे । मोडवितां दोघे नरका जाती ॥१॥

शुद्धबुद्धि होय दोघां एक मान । चोरासवें कोण जिवें राखे ॥ध्रु.॥

आपुलें देऊनी आपुला चि घात । न करावा थीत जाणोनियां ॥२॥

देऊनियां वेच धाडी वाराणसी । नेदावें चोरासि चंद्रबळ ॥३॥

तुका म्हणे तप तीर्थ व्रत याग । भक्ति हे मारग मोडूं नये ॥४॥

अर्थ :- एखाद्या व्यक्तिने दुसर्याला एकादशी व्रत करावयास लावणे तर तो पुण्याच्या वातेकरि होतो, पण व्रत मोडले गेले की ते दोघेही नरकात जातात ।।1।।

सद्बुद्धि असलेल्या माणसाची संगती केलि की मांसन्नमान मिळतो, चोरांची संगती केलि तर शिक्षा मिळते  ।।ध्रु।।

आपल्या जावाळील सर्वस्व देऊन आपलेच अहित करुण घेऊ नये , आपले हित ओळखावे ।।2।।

सद्बुद्धि असलेल्या माणसाला काशी-वारानाशिला जाण्यास मदत करावी-पण चोराला चंद्रबळा  (चोरीची वेळ) सांगू नये ।।3।।

तुकोबा म्हणतात, तप, तीर्थ, व्रत, यज्ञयाग हे भक्तिमार्ग आहेत. हे कढ़ी सोडु नये ।।4।।

३१२एकादशीस अन्न पान

गाथा अभंग ३१२

एकादशीस अन्न पान । जे नर करिती भोजन । श्वानविष्ठे समान । अधम जन तो एक ॥१॥

ऐका व्रताचें महिमान। नेमें आचरती जन । गाती ऐकतीं हरिकीर्तन । ते समान विष्णूशीं ॥ध्रु.॥

अशुद्ध विटाळसीचें खळ । विडा भिक्षतां तांबूल । सांपडे सबळ । काळाहातीं न सुटे ॥२॥

सेज बाज विलास भोग । करी कामिनीशीं संग । तया जोडे क्षयरोग । जन्मव्याधी बळिवंत ॥३॥

आपण न वजे हरिकीर्तना । अणिकां वारी जातां कोणा । त्याच्या पापें जाणा । ठेंगणा महा मेरु ॥४॥

तया दंडी यमदूत । जाले तयाचे अंकित । तुका म्हणे व्रत । एकादशी चुकलीया ॥५॥

अर्थ :- एकादशिला भोजन करणारे अधम आहेत; ते खात असलेले अन्न कुत्र्याच्या विष्टे प्रमाणे आहे ।।1।।

या एकाढशि वृताचे महत्त्व असे आहे की जे कोणी हे व्रत करतील, हरिकीर्तन करतील ते विष्णुसमान आहेत ।।ध्रु।।

एकादशिला जो पाण्याचा विडा खाइल त्याने विटाळशीचा स्ताव खाल्ल्याप्रमाने होईल. त्याला काळ खाऊन टाकल ।।2।।

या वृताच्या दिवशी जो पत्नीशी व अन्य स्त्रीशी संग करेल, विविध प्रकारचे भोग घेईल, त्याला क्षय-महारोगासारख्या व्याधी जड़तील ।।3।।

या दिवशी जो हरिकीर्तन करत नाही व इतरानाही करू देत नाही तो पर्वता एवढ्या पापाचा धनी होतो, त्याच्या पाप्राशिपुढे मेरु पर्वतही लहान वाटतो ।।4।।

तुकोबा म्हणतात, जे लोक एकादशी व्रत करत नाही त्याना यमदूत यातना मई शिक्षा देतो ।।5।।

३१०काय कळे बाळा

गाथा अभंग ३१०

काय कळे बाळा । बाप सदैव दुबळा ॥१॥

आहे नाहीं हें न कळे । हातीं काय कोण्या वेळे ॥ध्रु.॥

देखिलें तें दृष्टी । मागे घालूनियां मिठी ॥२॥

तुका म्हणे भावें । माझ्या मज समजावें ॥३॥

अर्थ :- लहान मुलाला आपला बाप श्रीमंत आहे की गरीब आहे हे कळत नास्ते ।।1।।

आपल्याला एखादी वास्तु देने शाक्य होईल की नाही हे त्याला समजत नसते ।।ध्रु।।

एखादि वस्तु पाहिली की हत्ता करुण ती घेणे एवढेच त्याला कळते ।।2।।

तुकोबा म्हणतात, माझ्या मनातहि विठ्ठला प्रती असाच भाव आहे. तो त्याने समजून घेऊन, मला जाणावें ।।3।।

३०९एक तटस्थ मानसीं

गाथा अभंग ३०९

एक तटस्थ मानसीं । एक सहज चि आळसी ॥१॥

दोन्ही दिसती सारिखीं । वर्म जाणे तो पारखी ॥ध्रु.॥

एक ध्यानीं करिती जप । एक बैसुनि घेती झोप ॥२॥

एकां सर्वस्वाचा त्याग। एकां पोटासाठीं जोग ॥३॥

एकां भक्ति पोटासाठीं । एकां देवासवें गांठी ॥४॥

वर्म पोटीं एका । फळें दोन म्हणे तुका ॥५॥

अर्थ :- एक व्यक्ति नामस्मरण भक्ति करतांना तटस्त बसली आहे, तर दूसरी व्यक्ति आलसामुळे तटस्त बसली आहे ।।1।।

अश्या दोन्ही व्यक्तींच्या शारीरिक अवस्ता एकच असली तरी त्यांच्या मानसिकतेतिल फरक जानकाराला कळेल ।।ध्रु।।

एक भगवंत चिंतना करता डोळे मिटुन ध्यानस्त बसतो आणि दूसरा बसून  झोप घेतो ।।2।।

एक सर्वस्वाचा त्याग करुण साधू होतो, तर दूसरा पोट भरण्यासाठी साधू होतो ।।3।।

एकजण देवासाठी भक्ति करतो, तर दूसरा पोटासाठी बक्ति करतो ।।4।।

तुकाराम महाराज म्हणतात, दोघेही एकाच प्रकारचे आचरण करीत असले तरी त्यांच्यातील मनातील भाव वेगळे असल्यामुळे त्यांना फळेही वेगवेगळ्या प्रकारची मिळतात ।।5।।

३०८अवघें ब्रम्हरूप रिता नाहीं ठाव

गाथा अभंग ३०८

अवघें ब्रम्हरूप रिता नाहीं ठाव । प्रतिमा तो देव कैसा नव्हे ॥१॥

नाहीं भाव तया सांगावें तें किती । आपुल्याला मतीं पाषांडिया ॥ध्रु.॥

जया भावें संत बोलिले वचन । नाहीं अनुमोदन शाब्दिकांसि ॥२॥

तुका म्हणे संतीं भाव केला बळी । न कळतां खळीं दूषिला देव ॥३॥

अर्थ :- सर्व चराचर सृष्टिमध्ये परमेस्वर भरून राहिला आहे, म्हणजे तो पाषाणाच्या धातुच्या मूर्तिमध्ये असनाराच ना! ।।1।।

पाखंड किंवा नास्तिक मनुष्याला हे सांगून काय उपयोग ? ।।ध्रु।।

संतांच्या मनातील श्रद्धा व भक्ती नास्तिकांच्या मनी नसल्यामुळे त्याना सांत्वचनाचे महत्त्व कळणार नाही ।।2।।

तुकोबा म्हणतात, संत सगुणभक्तिचा अनुभव नास्तिकाणां नसल्यामुळे ते सगुन भक्तिचा निषेध करतात ।।3।।

३०७अरे हें देह व्यर्थ जावें

गाथा अभंग ३०७

अरे हें देह व्यर्थ जावें । ऐसें जरी तुज व्हावें । द्यूतकर्म मनोभावें । सारीपाट खेळावा ॥१॥

मग कैचें हरिचें नाम । निजेलिया जागा राम । जन्मोजन्मींचा अधम । दुःख थोर साधिलें ॥ध्रु.॥

विषयसुखाचा लंपट । दासीगमनीं अतिधीट । तया तेचि वाट । अधोगती जावया ॥२॥

अणीक एक कोड । नरका जावयाची चाड । तरी संतनिंदा गोड । करीं कवतुकें सदा ॥३॥

तुका म्हणे ऐसें । मना लावी राम पिसें । नाहीं तरी आलिया सायासें । फुकट जासी ठकोनी ॥४॥

अर्थ :- हां नरदेह वाया जावा असे तुला वाटेत असेल तर तू खुशाल सारिपाट खेळत रहा ।।1।।

मग हरिचे नाम तुझ्या मुखी येणार नाही, तू अज्ञानाच्या निद्रित असल्यामुळे राम तुला भेटनार नाही, त्यामुळे तुला जन्मों जन्मीचे दुःख भोगावि लागेल ।।ध्रु।।

प्रपंच्यातील विषयसुखाची लंपटता, परस्त्री आसक्ति या सर्व अधोगतिला जाणाऱ्या वाटा आहेत ।।2।।

नरकात जाण्यासाठी संतनिंदा हा आणखी एक मार्ग आहे ।।3।।

तुकोबा म्हणतात, नारादेहाचे सार्थक व्हावे असे वाटत असेल तर मनाला रामाचे वेड लाउन घे, नाहीतर नाराजन्माचे सर्व कष्ट फुकट जातील ।।4।।

३०६धिग जीणें तो बाइले आधीन

गाथा अभंग ३०६

धिग जीणें तो बाइले आधीन । परलोक मान नाही दोन्ही ॥१॥

धिग जीणें ज्याचें लोभावरी मन । अतीतपूजन घडे चि ना ॥ध्रु.॥

धिग जीणें आळस निद्रा जया फार । अमित आहार अघोरिया ॥२॥

धिग जीणें नाहीं विवेक वैराग्य । झुरे मानालागीं साधुपणा ॥३॥

तुका म्हणे धिग ऐसे जाले लोक । निंदक वादक नरका जाती ॥४॥

अर्थ :- जो गृहस्त पत्नीच्या अहारी गेलेला आहे त्याच्या जीवनाचा तुकाराम महाराज धिक्कार करतात, त्याला इहलोक व परलोकि मान मिळत नाही ।।1।।

जो मनुष्य सतत लोभाचाच विचार करात असतो, त्याचा हातून अतिथी- पूजा घडत नहीं, त्या मनुष्याचाहि धीक्कार असो ।।ध्रु।।

ज्याला आळस,निद्रा, भरपूर आहार याची आवड आहे, त्या पुरुषयाचाहि धिक्कार असो ।।2।।

जो मनुष्य विवेक आणि वैराग्याविना साधुत्वाची अपेक्षा करतो, त्याचाहि दिक्कार असो ।।3।।

तुकोबा म्हणतात, परनिंदा करणारा आणि निष्कारण वाद घालनाराहि अंती नरकात जातात, त्यांच्याही जीवनाचा धिक्कार असो  ।।4।।

तुकोबा म्हणतात,

३०४बोलविसी तैसें आणीं अनुभवा

गाथा अभंग ३०४

बोलविसी तैसें आणीं अनुभवा । नाहीं तरी देवा विटंबना ॥१॥

मिठेंविण काय करावें मिष्टान्न । शव जीवेंविण शृंगारिले ॥ध्रु.॥

संपादणीविण विटंबिले सोंग । गुणेंविण चांग रूप हीन ॥२॥

कन्यापुत्रेंविण मंगळदायकें । वेचिलें हें फिके द्रव्य तरी ॥३॥

तुका म्हणे तैसी होते मज परी । न देखे अंतरीं प्रेमभाव ॥४॥

अर्थ :- हे विठ्ठला, तू जसे मला बोलविन्यास शिकवितोस, अनुभव देतोस, तसे मझ्याकडून लिहिले जावे; नाहीतर जगात माझी फजीती होईल ।।1।।

मिठाशिवाय मिष्टान्नाला चाव येत नाही किंवा ज्या शरीरात प्राण नाही, त्याला शृंगार करुण उपयोग नाही ।।ध्रु।।

एखादे सांग वठविन्यासाठी रूप व गुण यांची आवशकता भासते ।।2।।

थाटामातात केलेल्या विवाहसमारंभाला नावरानावरिशिवाय शोभा नाही ।।3।।

तुकोबा महानता, भावाविन भक्ति ही वरील सर्व उदाहराणप्रमाने व्यर्थ आहे ।।4।।

३०३छळी विष्णुदासा कोणी

गाथा अभंग ३०३

छळी विष्णुदासा कोणी । त्याची अमंगळ वाणी ॥१॥

येऊं न द्यावा समोर । अभागी तो दुराचार ॥ध्रु.॥

नावडे हरिकथा । त्याची व्यभिचारीण माता ॥२॥

तुका म्हणे याति । भ्रष्ट तयाचि ते मति ॥३॥

अर्थ :- विंष्णु दासांना जे कुणी अप शब्दात बोलता त्यांची वाणी ही अपवित्र असते म्हणून अश्याणाच ते सुचते ।।1।।

अश्या लोकांना जवळही फिरकु न द्यावे असे लोक अपवित्र असतात ।।ध्रु।।

त्यावर मातृत्वाची शिकवण चांगली झाली नसावी त्यामुळे त्याला हरिकथा आवड नाही ।।2।।

तुकोबा म्हणतात, अस वागल्याने त्याची मति तो त्याच्याच हाताने भृष्ट करतो आहे ।।3।।

३०२आंधळ्यासि जन अवघे चि आंधळे । आपणासि डोळे दृष्टी नाहीं ॥१॥ रोग्या विषतुल्य लागे हें मिष्टान्न । तोंडासि कारण चवी नाहीं ॥२॥ तुका म्हणे शुद्ध नाहीं जो आपण । तया त्रिभुवन अवघें खोटें ॥३॥ अर्थ :- आंधळयाला दृष्टी नसल्यामुळे सर्व जगच आंधले भासते ।।1।। आजारी माणसाला तोंडालाचव नसल्यामुळे सुग्रास भोजन त्याला विषतुल्य भासते ।।2।। तुकोबा म्हणतात, ज्याचे चित्त शुद्ध नाही, त्याला सारे त्रभुवन खोटे भासते ।।3।।

गाथा अभंग ३०२

आंधळ्यासि जन अवघे चि आंधळे । आपणासि डोळे दृष्टी नाहीं ॥१॥

रोग्या विषतुल्य लागे हें मिष्टान्न । तोंडासि कारण चवी नाहीं ॥२॥

तुका म्हणे शुद्ध नाहीं जो आपण । तया त्रिभुवन अवघें खोटें ॥३॥

अर्थ :- आंधळयाला दृष्टी नसल्यामुळे सर्व जगच आंधले भासते ।।1।।

आजारी माणसाला तोंडालाचव नसल्यामुळे सुग्रास भोजन त्याला विषतुल्य भासते ।।2।।

तुकोबा म्हणतात, ज्याचे चित्त शुद्ध नाही, त्याला सारे त्रभुवन खोटे भासते ।।3।।

३०१माझें म्हणतां याला कां रे नाहीं लाज

गाथा अभंग ३०१

माझें म्हणतां याला कां रे नाहीं लाज । कन्या पुत्र भाज धन वित्त ॥१॥

कोणी सोडवी ना काळाचे हातींचें । एकाविणें साचें नारायणा ॥२॥
 
तुका म्हणे किती सांगावें चांडाळा । नेणे जीवकळा कोण्या जीतो ॥३॥

अर्थ :- एखादी गोष्ट 'माझी' आहे, ऎसे म्हणताना तुला लाज कशी रे वाटत नाही ? कन्या, पुत्र, धन संप्पत्ति सारे माझे आहे, असे म्हणणे म्हणजे वेडेपना नाही काय ? ।।1।।

सारे नातेवाईक किंवा धन- संपत्ति आपल्याला कालपुरुषयाच्या तावडीतून सोडवू शकत नाही. भगवंत हाच फक्त खरा आहे. बाकी काही खरे नाही ।।2।।

तुकाराम महाराज म्हणतात, या चांडालाना किती वेळा सांगावे, की असे जीवन का घालविता? ।।3।।

३००मृगजळा काय करावा उतार

गाथा अभंग ३००

मृगजळा काय करावा उतार । पावावया पार पैल थडी ॥१॥

खापराचे होन खेळती लेंकुरें । कोण त्या वेव्हारें लाभ हाणि ॥ध्रु.॥

मंगळदायक करिती कुमारी । काय त्यांची खरी सोयरीक ॥२॥

स्वप्नींचें जें सुखदुःख जालें काहीं । जागृतीं तो नाहीं साच भाव ॥३॥

सारीं जालीं मेलीं लटिकें वचन । बद्ध मुक्त शीण तुका म्हणे ॥४॥

अर्थ :- मृगजलाची नधि पार करण्यासाठी पायउतारा व्हावे लगत नाही ।।1।।

खपरच्या खोट्या पैश्याने मुले खळतात , त्यात खरोखरचा आर्थिक लाभ हानी नासते ।।ध्रु।।

लहान मूली बाहुला-बाहुलीचे लग्न करतात; पण त्यात खरे नाथे जोडले जात नाहीत ।।2।।

स्वप्नातील सुखदुःखाशी जागृतिमधील जीवनातील काहीही संमंध नसतो ।।3।।

खेळाच्या पतावरि सोंगत्या मरतात, जगतात हे सर्व जसे खोटे असते, तसेच बध्दता, मुक्तता हे शब्द आत्म्याला लागू पडत नाही, असे तुकोबा म्हणतात ।।4।।

२९९आमचे गोसावी अयाचितवृत्ती

गाथा अभंग २९९

आमचे गोसावी अयाचितवृत्ती । करवी शिष्याहातीं उपदेश ॥१॥

दगडाची नाव आधींच ते जड । ते काय दगड तारूं जाणे ॥१॥

तुका म्हणे वेष विटंबिला त्यांनी । सोंगसंपादणी करिती परी॥३॥

अर्थ :- काही गोसावी आपली अयाचित (दान घेण्याची) वृत्ती स्वत: न सांगता शिष्याकडून सांगतात ।।1।।

दगडाचि जड़ नाव इतर दगडांना पैलतीरावर नेउ शकणार नाही; कारण ती स्वतः पाण्यात तरंगत नाही ।।2।।

तुकाराम महाफज म्हणतात, साधुचा वेश परिधान करण्याचे सोंग करुण त्यांनी साधुत्व विटंबिले आहे ।।3।।

२९८साधूनी बचनाग खाती तोळा तोळा ।

गाथा अभंग २९८

साधूनी बचनाग खाती तोळा तोळा । आणिकातें डोळां न पाहवे ॥१॥

साधूनी भुजंग धरितील हातीं । आणिकें कापती देखोनियां ॥२॥

असाध्य तें साध्य करितां सायास । कारण अभ्यास तुका म्हणे ॥३॥

अर्थ :- कही लोक सरावपूर्वक सर्पविष खान्याची कला करतात, पण इतरांना ते पाहावात नाही ।।1।।

काही लोक सर्प पकदन्याची जाणून हातात सर्प पकड़तात, इतर लोक मात्र ते पाहुन भयान कापतात ।।2।।

तुकोबा म्हणतात, जगात जे अशक्य आहे ते प्रयत्नपूर्वक साध्य करणारे लोक असतात ।।3।।