गाथा अभंग ३०४
बोलविसी तैसें आणीं अनुभवा । नाहीं तरी देवा विटंबना ॥१॥
मिठेंविण काय करावें मिष्टान्न । शव जीवेंविण शृंगारिले ॥ध्रु.॥
संपादणीविण विटंबिले सोंग । गुणेंविण चांग रूप हीन ॥२॥
कन्यापुत्रेंविण मंगळदायकें । वेचिलें हें फिके द्रव्य तरी ॥३॥
तुका म्हणे तैसी होते मज परी । न देखे अंतरीं प्रेमभाव ॥४॥
अर्थ :- हे विठ्ठला, तू जसे मला बोलविन्यास शिकवितोस, अनुभव देतोस, तसे मझ्याकडून लिहिले जावे; नाहीतर जगात माझी फजीती होईल ।।1।।
मिठाशिवाय मिष्टान्नाला चाव येत नाही किंवा ज्या शरीरात प्राण नाही, त्याला शृंगार करुण उपयोग नाही ।।ध्रु।।
एखादे सांग वठविन्यासाठी रूप व गुण यांची आवशकता भासते ।।2।।
थाटामातात केलेल्या विवाहसमारंभाला नावरानावरिशिवाय शोभा नाही ।।3।।
तुकोबा महानता, भावाविन भक्ति ही वरील सर्व उदाहराणप्रमाने व्यर्थ आहे ।।4।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा