सोमवार, ३० नोव्हेंबर, २०१५

३०४बोलविसी तैसें आणीं अनुभवा

गाथा अभंग ३०४

बोलविसी तैसें आणीं अनुभवा । नाहीं तरी देवा विटंबना ॥१॥

मिठेंविण काय करावें मिष्टान्न । शव जीवेंविण शृंगारिले ॥ध्रु.॥

संपादणीविण विटंबिले सोंग । गुणेंविण चांग रूप हीन ॥२॥

कन्यापुत्रेंविण मंगळदायकें । वेचिलें हें फिके द्रव्य तरी ॥३॥

तुका म्हणे तैसी होते मज परी । न देखे अंतरीं प्रेमभाव ॥४॥

अर्थ :- हे विठ्ठला, तू जसे मला बोलविन्यास शिकवितोस, अनुभव देतोस, तसे मझ्याकडून लिहिले जावे; नाहीतर जगात माझी फजीती होईल ।।1।।

मिठाशिवाय मिष्टान्नाला चाव येत नाही किंवा ज्या शरीरात प्राण नाही, त्याला शृंगार करुण उपयोग नाही ।।ध्रु।।

एखादे सांग वठविन्यासाठी रूप व गुण यांची आवशकता भासते ।।2।।

थाटामातात केलेल्या विवाहसमारंभाला नावरानावरिशिवाय शोभा नाही ।।3।।

तुकोबा महानता, भावाविन भक्ति ही वरील सर्व उदाहराणप्रमाने व्यर्थ आहे ।।4।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा