गाथा अभंग ३०२
आंधळ्यासि जन अवघे चि आंधळे । आपणासि डोळे दृष्टी नाहीं ॥१॥
रोग्या विषतुल्य लागे हें मिष्टान्न । तोंडासि कारण चवी नाहीं ॥२॥
तुका म्हणे शुद्ध नाहीं जो आपण । तया त्रिभुवन अवघें खोटें ॥३॥
अर्थ :- आंधळयाला दृष्टी नसल्यामुळे सर्व जगच आंधले भासते ।।1।।
आजारी माणसाला तोंडालाचव नसल्यामुळे सुग्रास भोजन त्याला विषतुल्य भासते ।।2।।
तुकोबा म्हणतात, ज्याचे चित्त शुद्ध नाही, त्याला सारे त्रभुवन खोटे भासते ।।3।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा