गाथा अभंग ३१७
येथीचिया अळंकारें । काय खरें पूजन ॥१॥
वैकुंठींच्या लावूं वाटा । सर्व साटा ते ठायीं ॥ध्रु.॥
येथीचिया नाशवंतें । काय रितें चाळवूं ॥२॥
तुका म्हणे वैष्णव जेन । माझे गण समुदाय ॥३॥
अर्थ :- पृथवितलावरील क्षणभंगुर अलंकाराणे केलेले पूजन हे खरे पूजन नव्हे ।।1।।
खरे पूजन करण्यासाठी वैकुंठाचा मार्ग चालावा लागतो, तेथे शास्वत सुखाचा भांडार मिलते ।।ध्रु।।
इहलोकातील सर्व सूखे अशाश्वत आहेत; त्यासाठी मी तुम्हाला त्याचा मोहत पाडत नाही ।।2।।
तुकोबा म्हणतात, वैकुंठाचा मार्ग चालविनारे वैष्णव हेच माझे खरे सोबती आहेत ।।3।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा