गाथा अभंग ३०६
धिग जीणें तो बाइले आधीन । परलोक मान नाही दोन्ही ॥१॥
धिग जीणें ज्याचें लोभावरी मन । अतीतपूजन घडे चि ना ॥ध्रु.॥
धिग जीणें आळस निद्रा जया फार । अमित आहार अघोरिया ॥२॥
धिग जीणें नाहीं विवेक वैराग्य । झुरे मानालागीं साधुपणा ॥३॥
तुका म्हणे धिग ऐसे जाले लोक । निंदक वादक नरका जाती ॥४॥
अर्थ :- जो गृहस्त पत्नीच्या अहारी गेलेला आहे त्याच्या जीवनाचा तुकाराम महाराज धिक्कार करतात, त्याला इहलोक व परलोकि मान मिळत नाही ।।1।।
जो मनुष्य सतत लोभाचाच विचार करात असतो, त्याचा हातून अतिथी- पूजा घडत नहीं, त्या मनुष्याचाहि धीक्कार असो ।।ध्रु।।
ज्याला आळस,निद्रा, भरपूर आहार याची आवड आहे, त्या पुरुषयाचाहि धिक्कार असो ।।2।।
जो मनुष्य विवेक आणि वैराग्याविना साधुत्वाची अपेक्षा करतो, त्याचाहि दिक्कार असो ।।3।।
तुकोबा म्हणतात, परनिंदा करणारा आणि निष्कारण वाद घालनाराहि अंती नरकात जातात, त्यांच्याही जीवनाचा धिक्कार असो ।।4।।
तुकोबा म्हणतात,
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा