गाथा अभंग ३१९
बोलावें तें धर्मा मिळे । बरे डोळे उघडूनि ॥१॥
काशासाठीं खावें शेण । जेणें जन थुंकी तें ॥ध्रु.॥
दुजें ऐसें काय बळी । जें या जाळी अग्नीसि ॥२॥
तुका म्हणे शूर रणीं । गांढें मनीं बुरबुरी ॥३॥
अर्थ :- बोलताना दोळसपनाने, धर्मसंकेतानुसार बोलावे ।।1।।
बोलू नये ते जर बोललो तर लोक आपल्यावर थुंकतील ।।ध्रु।।
आपण इतके बलवान आहोत का की या समाजपुरुषाला जाळु ? ।।2।।
तुकोबा म्हणतात, शुर मनुष्य राणांगनावर शस्त्रसज्ज होऊन उभा राहतो, तर भित्रा मनुष्य घरात नुसत्या बढ़ाया मारतो ।।3।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा