गाथा अभंग २९७
कोणें तुझा सांग केला अंगीकार । निश्चिति त्वां थोर मानियेली ॥१॥
कोणें ऐसा तुज उपदेश केला । नको या विठ्ठला शरण जाऊं ॥ध्रु.॥
तेव्हां तुज कोण घालील पाठीसी । घासील भूमीसी वदन यम ॥२॥
कां रे नागवसी आयुष्य खातो काळ । दिसेंदिस बळ क्षीण होतें ॥३॥
तुका म्हणे यासि सांगा कोणी तरी । विसरला हरी मायबाप ॥४॥
अर्थ :- तुझा कोणी अंगीकार केला की, तू त्याला थोर मानतो ।।1।।
विठ्ठालाला शरण जावु नको, म्हणून तुला कोणी उपदेश केला आहे का ? ।।ध्रु।।
जेव्हा यम समोर येईल तेव्हा तुला कोण पाठीशी घालेल ।।2।।
काळ क्षणाक्षणाने तुझे आयुष्य खात आहे; त्यामुळे तुझे बळ दिवसेंदिवस कमी होत आहे ।।3।।
तुकोबा म्हणतात, आशा नास्तिकाला कोणीतरी परमेस्वराची अठावन करुण दया ; कारण तो त्यालाच विसरला आहे ।।4।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा