गाथा अभंग ३२१
दाता नारायण । स्वयें भोगिता आपण ॥१॥
आतां काय उरलें वाचे । पुढें शब्द बोलायाचे ॥ध्रु.॥
देखती जे डोळे । रूप आपुलें तें खेळे ॥२॥
तुका म्हणे नाद । जाला अवघा गोविंद ॥३॥
अर्थ :- मनुष्याला सर्व सुख देणारा नारायन आहे आणि उपभोगनाराहि तोच आहे ।।1।।
त्यामुळे माणसाला बोलायला पुढे जागाच् राहिली नाही ।।ध्रु।।
आपले डोळे, त्या डोळ्यांना दिसनारे रूप सर्व काही तोच आहे ।।2।।
तुकोबा म्हणतात, मुखातून निघनारे शब्द आणि ते शब्द श्रवण करणारे कान, शब्दांचा नाद सर्व काही गोविंदच आहे ।।3।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा