गाथा अभंग ३१८
उजळावया आलों वाटा । खरा खोटा निवाड ॥१॥
बोलविले बोल बोलें । धनीविठ्ठला सन्निध ॥ध्रु.॥
तरी मनीं नाहीं शंका । बळें एका स्वामीच्या ॥२॥
तुका म्हणे नये आम्हां । पुढें कामा गबाळ ॥३॥
अर्थ :- मी प्रपंच्याकडून परमारथाकडे जाणारी वाट उजळविन्यासाठी व सत्य-असत्य संगन्यासाठी आलो आहे ।।1।।
माझा बोलविता धनी तो विठ्ठल आहे. तो जसे बोलवितो, तसे मी बोलतो ।।ध्रु।।
त्यामुळे माझ्या विठोबाच्या सल्यानुसार असणाऱ्या माझ्या बोलाविषयी तुम्ही शंका घेऊ नाका ।।2।।
तुकोबा म्हणतात, की हरिभक्तांमध्ये अडथळा आणणारी साधने आम्हाला चालानार नाही ।।3।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा