गाथा अभंग ३०३
छळी विष्णुदासा कोणी । त्याची अमंगळ वाणी ॥१॥
येऊं न द्यावा समोर । अभागी तो दुराचार ॥ध्रु.॥
नावडे हरिकथा । त्याची व्यभिचारीण माता ॥२॥
तुका म्हणे याति । भ्रष्ट तयाचि ते मति ॥३॥
अर्थ :- विंष्णु दासांना जे कुणी अप शब्दात बोलता त्यांची वाणी ही अपवित्र असते म्हणून अश्याणाच ते सुचते ।।1।।
अश्या लोकांना जवळही फिरकु न द्यावे असे लोक अपवित्र असतात ।।ध्रु।।
त्यावर मातृत्वाची शिकवण चांगली झाली नसावी त्यामुळे त्याला हरिकथा आवड नाही ।।2।।
तुकोबा म्हणतात, अस वागल्याने त्याची मति तो त्याच्याच हाताने भृष्ट करतो आहे ।।3।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा