गाथा अभंग २९४
प्रारब्ध क्रियमाण । भक्तां संचित नाहीं जाण ॥१॥
अवघा देव चि जाला पाहीं । भरोनियां अंतर्बाहीं ॥ध्रु.॥
सत्वरजतमबाधा । नव्हे हरिभक्तांसि कदा ॥२॥
खाय बोले करी । अवघा त्यांच्या अंगें हरी ॥३॥
देवभक्तपण । तुका म्हणे नाहीं भिन्न ॥४॥
अर्थ :- भक्तानां नशीब, कर्म आणि पाप्पुन्याचा साठा भोगवा लगत नाही ।।1।।
करम तो भक्त अंतर्बाह्य भगवंताशि एकरूप झालेला असतो ।।ध्रु।।
हरिभक्तांना सत्त्व-रज-तमाची बाधा होत नाही ।।2।।
तुकोबा म्हणतात, की देव आणि भक्त एकरूप झालेले असतात ।।3।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा