रविवार, २० सप्टेंबर, २०१५

१३६शुद्ध दळणाचें सुख सांगों काई

दळण - अभंग १

गाथा अभंग १३६

शुद्ध दळणाचें सुख सांगों काई । मानवित सईबाई तुज ॥१॥

शुद्ध तें वळण लवकरी पावे । डोलवितां निवे अष्टांग तें ॥ध्रु.॥

शुद्ध हें जेवितां तन निवे मन । अल्प त्या इंधन बुडा लागे ॥२॥

शुद्ध त्याचा पाक सुचित चांगला । अविट तयाला नाश नाहीं ॥३॥

तुका म्हणे शुद्ध आवडे सकळां । भ्रतार वेगळा न करी जीवें ॥४॥

अर्थ :- हे सईबाई, शुद्ध आचरणपूर्वक  हरिनामरूपी दळणाचे सुख किती व कसे असते म्हणून सांग ? ते आम्हाला मानवले नाही ।।1।।

असे शुद्ध दळन लवकर होते, दलनात अंग डोलू लागते, त्यामुळे उष्टांग शांत होते ।।ध्रु।।

जेवन शीजवतांना इंधन कमी लागते. ते जेवण तन- मन शांत करते ।।2।।

जेवण (स्वयंपाक) शुद्ध व चांगला झालेला आहे. ते अविट आहे. त्याचा नाश नाही ।।3।।

तुकाराम महाराज म्हणतात, जे शुद्ध असते ते सर्वांना आवडते. शुद्ध पाक तैयार करणाऱ्या स्त्रीला तिचा नवरा प्रेमपूर्वक, जीवाभावाने आपलेसे करतो, कधीच दूर लोटत नाही ।।4।।.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा