हाल - अभंग २
हाल - अभंग 1
गाथा अभंग१४५
यमुनेतटीं मांडिला खेळ । म्हणे गोपाळ गडियांसि ॥१॥
हाल महाहाल मांडा । वाउगी सांडा मोकळी ॥ध्रु.॥
नांवें ठेवूनि वांटा गडी । न वजे रडी मग कोणी ॥२॥
तुका म्हणे कान्हो तिळतांदळ्या । जिंके तो करी आपुला खेळ्या ॥३॥
अर्थ :- यमुनाकाठि वाळवंतात खेल मांडला. श्रीकृष्ण सवंगड्यांना म्हणाला, ।।1।।
बाबांनो कोटा खेळ खलायचा हे नीच्छित करा. त्याचे नियम ठरवा मागच्या खेळा. मोकातापने स्वैराचारि खेळण्यात काय माझ्या आहे ? ।।ध्रु।।
या गड्यांपाकि मुमुक्षु कोण. मुक्त कोण, विषयी कोण, पापी कोण हे त्यांच्या लक्षणांवरुन ठरवा, त्याना ताशी नावे आणि गाड़ी वाटून दया म्हणजे ते रडी जाणार नाहीत ।।2।।
तुकाराम महाराज म्हणतात, कामक्रोधादि रूपातील तिला-तांदळाला जो जिंकून घेतो, त्यालाच श्रीकृष्ण आपल्याबरोबर खेलनारा गड़ी मानतो ।।3।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा