आडसण दळण - अभंग १
गाथा अभंग १३५
शुद्धीचें सारोनि भरियेली पाळी । भरडोनि वोंगळी नाम केलें ॥१॥
आडसोनि शुद्ध करीं वो साजणी । सद्धि कां पापिणी नासियेलें ॥ध्रु.॥
सुपीं तों चि पाहें धड उगटिलें । नव्हतां नासिलें जगझोडी ॥२॥
सुपीं तों चि आहे तुज तें आधीन । दळिल्या जेवण जैसें तैसें ॥३॥
सुपीं तों चि संग घेइप धडफुडी । एकसा गधडी नास केला ॥४॥
दळितां आदळे तुज कां न कळे । काय गेले डोळे कान तुझे ॥५॥
सुपीं तों चि वोज न करितां सायास । पडसी सांदीस तुका म्हणे ॥६॥
अर्थ :- एका स्त्री ने परमार्थाचे शुद्ध दळन बाजूला ठेऊन मन_बुद्धिरूपी जात्याची पाळी विषयांना भरून टाकली व ते विषय भरडुन परमार्थ नष्ट केला ।।1।।
हे पाहुन एक सुआहानि बाई तिला म्हणते, हे सखे, अंग, दळण निवाडायच, पाखडायचं असत. हे पापिनी, सिद्ध वस्तुंचा नाश तू का केलास ? ।।ध्रु।।
जो पर्यन्त तुझ्या हातात नरदेहाचे सुप आहे, तो पर्यन्त विचार कर. जसे दळन दळले जाईल, तसे खायला मिळेल . पंचक्रोशाचे फहोलपत वेगळे झाले नसता शुद्ध पर्मार्थाचा नाश का मकेलास ? ।।2।।
पुन्यात्मक कर्माचे दळन द्ळलेस तर सुखाचे जेवण मिळेल ।।3।।
परदेहाचे सुप जवळ असतांना संतसंगति कर. पर्मार्थाचा एकदम नाश का बारे केलास? ।।4।।
जोपर्यंत नारदेहाच सुप तुझ्या जवळ आहे, तोपर्यंत विचारपूर्वक अडसर (पाखड़ने) कर, नाहीतर नाश होईल ।।5।।
तुकाराम महाराज म्हणतात, जोपर्यंत (नारादेहरूपि) सुपात तुझा वास आहे, तोपर्यंत पर्मार्थाचे प्रयत्न कर; नाहीतर तू जन्ममृतुच्या सान्दी-कोपर्यात अडकून पदशील ।।6।।.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा