शुक्रवार, ४ सप्टेंबर, २०१५

१११चित्तीं नाहीं तें जवळीं असोनि काय

अभंग १११

चित्तीं नाहीं तें जवळीं असोनि काय । वत्स सांडी माय तेणें न्यायें ॥१॥

प्रीतीचा तो वायु गोड लागे मात । जरी जाय चित्त मिळोनियां ॥२॥

तुका म्हणे अवघें फिकें भावाविण । मीठ नाहीं अन्न तेणें न्यायें ॥३॥

अर्थ :- जे मणि नाही, ते जवळ असून उपयोग नाही, गाय ज्याप्रमाणे वासरू मोठे झाल्यावर त्याच्याकडे फारसे लक्ष देत नाही ।।1।।

अंतर्यामि जिव्हाळा असलेल्या दोन अंतरंगातील व्यक्ति एकमेकंपासून दूर असल्या तरी त्यांच्यामधे प्रेम असते ।।2।।

तुकोबा म्हणतात, की अन्न जसे मिठावाचुन बचव असते, तसे चित्तामधे भक्तिभाव नसेल तर परमार्थ होने कठिन असते ।।3।।  .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा