शुक्रवार, ४ सप्टेंबर, २०१५

१२०बैसवुनि फेरी । गडियां मध्यभागीं हरी । अवघियांचें करी । समाधान सारिखें

काला आणि खेळ अभंग१२०

बैसवुनि फेरी । गडियां मध्यभागीं हरी । अवघियांचें करी । समाधान सारिखें ॥१॥

पाहे तो देखे समोर । भोगी अवघे प्रकार । हरुषें झेली कर । कवळ मुखीं देती ते ॥ध्रु.॥

बोले बोलतिया सवें । देतील तें त्यांचें घ्यावें । एक एका ठावें । येर येरा अदृश्य ॥२॥

तुका म्हणे देवा । बहु आवडीचा हेवा । कोणाचिया जीवा । वाटों नेदी विषम ॥३॥

अर्थ :- गोलाकार फेर धलेल्या गोपाळांच्या समवेत श्रीहरि मध्यभागी बसला. त्यामुळे त्यानी सर्व गोपाळांचे सारखे समाधान केले ।।1।।

जो कुणी हरिकडे पाहत होता त्या प्रत्येकाला हरी आपल्या समोरच आहे, असे वाटत होते, प्रत्येकाच्या शोदोरित ज्या ज्या प्रकारचे अन्न होते,ते ते सेवन करीत होता. काही सवंगडी श्रीकृष्णच्या मुखात घास भरवित होते व तो ते खातहि होता ।।ध्रु।।

श्रीकृष्ण बोलणाऱ्या गोनालांबरोबर बोलत होता, ते जे काही प्रेमाने देतील, ते घेत होता. काहींना श्रीहरिच्या तात्विक स्वरुपाच्या खुनांचे ज्ञान होत होते. काहिना ते समजने शक्य होत नव्हते ।।2।।

तुकाराम महाराज म्हणतात, देवांना गोपाळांच्या प्रेमाची खुप आवड होती. त्यामुळे कोणाच्याही जीवाला परकेपना वाटत नव्हता ।।3।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा