शुक्रवार, ४ सप्टेंबर, २०१५

११९अवघे गोपाळ म्हणती या रे करूं काला । काय कोणाची सिदोरी ते पाहों द्या मला

काला आणि खेळ अभंग ११९

अवघे गोपाळ म्हणती या रे करूं काला । काय कोणाची सिदोरी ते पाहों द्या मला ।

नका कांहीं मागें पुढें रे ठेवूं खरें च बोला । वंची वंचला तो चि रे येथें भोवंडा त्याला ॥१॥

घेतल्या वांचून झाडा रे नेदी आपुलें कांहीं । एकां एक ग्वाही बहुत देती मोकळें नाहीं ।

ताक सांडी येर येर रे काला भात भाकरी दहीं । आलें घेतो मध्यें बैसला नाहीं आणवीत तें ही ॥ध्रु.॥

एका नाहीं धीर तांतडी दिल्या सोडोनि मोटा । एक सोडितील गाठी रे एक चालती वाटा ।

एक उभा भार वाहोनि पाहे उगाचि खोटा । एक ते करूनि आराले आतां ऐसें चि घाटा ॥२॥

एकीं स्थिराविल्या गाई रे एक वळत्या देती । एकांच्या फांकल्या वोढाळा फेरे भोंवतीं घेती ।

एकें चाराबोरा गुंतलीं नाहीं जीवन चित्तीं । एक एका चला म्हणती एक हुंबरी घेती ॥३॥

एकीं एकें वाटा लाविलीं भोळीं नेणतीं मुलें । आपण घरींच गुंतले माळा नासिलीं फुलें ।

गांठीचें तें सोडूं नावडे खाय आइतें दिलें । सांपडलें वेठी वोढी रे भार वाहातां मेलें ॥४॥

एक ते माया गुंतले घरीं बहुत काम । वार्ता ही नाहीं तयाची तया कांहीं च ठावें ।

जैसें होतें शिळे संचित तैसें लागलें खावें । हातोहातीं गेलें वेचुनि मग पडिलें ठावें ॥५॥

एकीं हातीं पायीं पटे रे अंगीं लाविल्या राखा । एक ते सोलिव बोडके केली सपाट शिखा ।

एक ते आळसी तळीं रे वरी वाढिल्या काखा । सिदोरी वांचून बुद्धि रे केला अवघ्यां वाखा ॥६॥

तुका म्हणे आतां कान्होबा आम्हां वांटोनि द्यावें । आहे नाहीं आम्हांपाशीं तें तुज अवघें चि ठावें ।

मोकलितां तुम्ही शरण आम्ही कवणासि जावें । कृपावंते कृपा केली रे पोट भरे तों खावें ॥७॥

अर्थ :- सर्व गोपाल म्हणू लागले की या, आता अपन काला करुया. श्रीकृष्ण म्हणाला, कोणी कोणी कोणकोणती पापपुण्याची शिदोरि सोबत आणली आहे, ते मला आधी पाहु द्या. माह-पुढे न पाहता, चोरीन काही न ठेवता जे खरे असेल ते सांगा. येथे जो फसवेल, तो स्वताच फसेल. आम्ही त्याला आमच्या समुहातुं बाहर काढू ।।1।।

श्रीहरि भक्तांकडून सर्वस्वचि झाड़ा-झड़ती घेतल्याशिवाय आपली स्वरूपस्तिती दाखवित नाही. प्रत्येकाच्या शिदोरित काय काय आहे, हे सर्वांना माहीत आहे. यासाठी शिदोरित काय आहे हे काळणाराच.कित्येकजन ताक टाकून देतात आणि कित्येकजन दही-भात-भाकरी काला करतात. गोपाळांन मध्ये बसलेला श्रीहरि सर्वांच्या शिदोर्या घेतो; पण तो स्वतः  कोनतीच शिदोरि आनत नाही ।।ध्रु।।

किती तरी जणांना धीर निघेणा म्हणून त्यांनी देहाभिमानाच्या गाठी सोडून टाकल्या. कित्तेकजन गाठ सोडून पुढच्या साधनमार्गाने चालु लागले, कित्तेकजन संसाराचे ओझे डोक्यावर घेऊन खोटे आभार पाहत राहिले.  परमार्थ करुन शांत झालेले लोक तुम्हीही असाच परमार्थ करा, असे सांगू लागले ।।2।।

एकाच्या गाइ (इंद्रिय) श्रीहरि जवळ विसावल्या. कित्येकजन विषयापासून आपल्या गाइन्ना श्रीहरिकडे वळवू पाहत होते. काही जणांच्या ओढाळगाइ विषयरूपि रानात स्वैरपने पळत सुतल्या, काहीनच्या गाइ विषयाभोवती फिरु लागल्या.काहीनच्या गाई अत्यल्प विषयरूपि चारा खाण्यात रामल्या. चित्तत हरिबद्दल जिव्हाळा नसला तरी एकमेकांना 'हरिकडे चला' असे महनत होत्या. कित्येक गाई गर्वाने हमबरु लागल्या ।।3।।

कित्येक संतांनी भोळ्या, अडानी मुलांना हरिप्राप्तिच्या मार्गाला लावले. काही शब्दपंडित दुसऱ्या वाट दाखउन स्वत: संसारतभोगात गुंगले. भक्तांकडून पूजा, सत्कात करून घेऊन कित्येकजन फुलांच्या माळांची नासडी करू लागले. कही द्रव्य लोभी, ज्याना स्वतः कडेंच खाने अवडत नाही. दुसर्याचे फुकटचे खतात, ते जन्ममृत्युच्या फेऱ्यात अडकतात. देहाभिमानाचे ओझे वाहून मरून जातात ।।4।।

कित्येकजन संसाराच्या मोहत गुंतलेले असतात, त्यामुळे पर्मार्थाचा विचार करात नाहित. आत्मरूपाचे ज्ञान नसते. त्यांना संचितकर्माचे शिळे अन्न खावे लगते. जे आयुष्य लाभलेले असते, हे हतोहात कहरच होते व नंतर तो जागा होतो ।।5।।

कित्येकजनांनी हात-पायावर भस्माचे पत्ते ओढले, सर्वांगाला राख फासलि, डोक्यावर्चे केस काढुन, शेंडीही काढून टाकली. जे आळशी आहेत, त्यांनी खालील केस वाढवले. थोडक्यात, अधिकाराच्या शिदोरि वाचून त्यांनी निर्बुद्धपने अकारण श्रम केले ।।6।।

तुकाराम महाराज म्हणतात, हे कान्हा, आता तुम्ही आम्हा सर्वांना आमच्या शिदोरितिल प्रसाद वाटून दया. आमच्या जवळ काय आहे काय नाही, ते सारे तुम्हाला ठाउक आहे. आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत, तूच आम्हाला अव्हेरलस, तर आम्ही कोठे जावे? कृपावंतांनी कृपा केलि, तरच पोटभर खायला मिळते ।।7।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा