हाल अभंग 2
गाथा अभंग १४६
बळें डाईं न पडे हरी । बुद्धि करी शाहणा तो ॥१॥
मोकळें देवा खेळों द्यावें । सम भावें सांपडावया ॥ध्रु.॥
येतो जातो वेळोवेळां । न कळे कळा सांपडती ॥२॥
तुका म्हणे धरा ठायींच्या ठायीं । मिठी जीवीं पायीं घालुनियां ॥३॥
अर्थ :- परमेश्वर ऐसा दुराग्रहात सापदनार नाही. आपल्या बुद्धिकौशल्याने जो वागेल, तो शहाना ।।1।।
देवाला मुक्तपने खेळूद्यावे तो सर्वव्यापी आहे; त्यामुळे भावाने तो सापड़तो ।।ध्रु।।
तो वारंवार येतो आणि जातो. त्याला शोधन्याची उक्ति उगांयुगे कोणाला सापडली नाही. तो आवतारकार्याने येतो आणि तेथिक कार्य संपले की नव्या आवतारात प्रविष्ट होतो ।।2।।
तुकाराम महाराज म्हणतात, तुमच्या जीवाची मीठी त्याच्या पायावर घाला आणि आहे तिथे त्याला धरा ।।3।।.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा