काला अभंग
गाथा अभंग १४०
पळाले ते भ्याड । त्यांसि येथें जाला नाड ॥१॥
धीट घेती धणीवरी । शिंकीं उतरितो हरी ॥ध्रु.॥
आपुलिया मतीं । पडलीं विचारीं तीं रितीं ॥२॥
तुका लागे घ्यारे पायां । कैं पावाल या ठाया ॥३॥
अर्थ - जे घाब्रट होते, ते पळून गेले. त्यांचा भित्रेपना त्यांच्या हिताच्या आड़ आला ।।1।।
हरिन शिंकाळी उतरिवाली. जे धाडसी होते, त्यांना भरपूर मिळाले ।।ध्रु।।
जे स्वतः च्या बुध्दीने विचारा करात बसले, ते उपाशी राहिले ।।2।।
तुकाराम महाराज म्हणतात, अरे' तुम्ही 'दूध घ्या ते पुन्हा इथे मिळणार नाही ।।3।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा