काला चेंडुफळी - अभंग १००
खेळाचे अभंग 1
गाथा अभंग ११४
झेला रे झेला वरचेवर झेला । हातिचें गमावी तो पाठीं साहे टोला ॥१॥
त्रिगुणाचा चेंडू हातें झुगारी निराळा । वरिलिया मुखें मन लावी तेथें डोळा ॥ध्रु.॥
आगळा होऊनि धरी वरिचिया वरी । चपळ तो जिंके गांढ्या ठके येरझारीं ॥२॥
हातीं सांपडलें उभें बैसों नेदी कोणी । सोरीमागें सोरी घेती ओणवें करूनि ॥३॥
डाई पडिलिया सोसी दुःखाचे डोंगर । पाठीवरी भार भोंवता ही उभा फेर ॥४॥
तुका म्हणे सुख पाहे तयाचें आगळें । जिंकी तो हरवी कोणी एका तरी काळें ॥५॥
अर्थ :- मित्रांनो, त्रिगुणात्मक देहरूपि असा हा चेंडू वरचेवर झेला. त्याला वारंवार पमर्थाकडे फेका. हा चेंडु जो हातचा गमावेल तो पाठीवर जन्ममृत्युचा टोला खाइल ।।1।।
हा त्रिगुणांचा चेंडू (देह) विचारांच्या हाताने, आत्मबुद्धिने झुगारुन दया. मी पण सोडून अंतर्मुख दृष्टीने आत्मस्वरूपात स्थिर करा ।।ध्रु।।
आत्मस्वरूपाच्या अनुभवाने व्यापक आणि उंच होऊन हा त्रिगुणात्मक देहरूपी चेंडू वरचेवर झेला. जो चपळ असतो, प्रपंचयरूपि डाव जिंकतो तो नामर्द, भित्रा असतो. जन्ममृत्युच्या फेरयत अडकतो ।।2।।
संचित, प्रारब्ध आणि क्रियनाम हे विसावा घेऊ देणार नाहीत. ओनवे करुन जन्ममृत्युचे एकामगे एक डाव घ्यायला लावतील ।।3।।
देहाविषयीच्या विचारात सापडल्यावर दुःखाचे डोंगर सोसावे लागतील. देह आणि त्यविषयीचे महत्त्व हे पाठीवर भाररूपाने राहतील. या दावात सहभागी असलेले आत्प-स्वकीय सभोतालि असतील ।।4।।
तुकाराम महाराज म्हणतात, जो एखदेवेळेस हरीला जिंकतो,तोच या खेळातील सुखाचा अनुभव घेतो ।।5।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा