शुक्रवार, ४ सप्टेंबर, २०१५

१२३यमुनें पाबळीं । गडियां बोले वनमाळी । आणा सिदोर्‍या सकळी । काला करूं आजी

काल आणि खेळ अभंग १२३

यमुनें पाबळीं । गडियां बोले वनमाळी । आणा सिदोर्‍या सकळी । काला करूं आजी ।

अवघें एके ठायीं । करूनि स्वाद त्याचा पाहीं । मजपाशीं आहे तें ही । तुम्हामाजी देतों ॥१॥

म्हणती बरवें गोपाळ । म्हणती बरवें गोपाळ । वाहाती सकळ । मोहरी पांवे आनंदें ।

खडकीं सोडियेल्या मोटा । अवघा केला एकवटा । काला करूनियां वांटा । गडियां देतो हरि ॥ध्रु.॥

एकापुढें एक । घाली हात पसरी मुख । गोळा पांवे तया सुख । अधिक चि वाटे ।

म्हणती गोड जालें । म्हणती गोड जालें । आणिक देई । नाहीं पोट धालें ॥२॥

हात नेतो मुखापासीं । एर आशा तोंड वासी । खाय आपण तयासी । दावी वांकुलिया ।

देऊनियां मिठी । पळे लागतील पाठीं । धरूनि काढितील ओठीं । मुखामाजी खाती ॥३॥

म्हणती ठकडा रे कान्हा । लावी घांसा भरी राणा । दुम करितो शहाणा । पाठोवाठीं तयाच्या ।

अवघियांचे खाय । कवळ कृष्णा माझी माय । सुरवर म्हणती हाय हाय । सुखा अंतरलों ॥४॥

एक एका मारी । ढुंगा पाठी तोंडावरी । गोळा न साहवे हरि । म्हणे पुरे आतां ।

येतो काकुलती । गोळा न साहवे श्रीपती । म्हणे खेळों आतां नीती । सांगों आदरिलें ॥५॥

आनंदाचे फेरी । माजी घालुनियां हरी । एक घालिती हुंबरी । वाती सिंगें पांवे ।

वांकडे बोबडे । खुडे मुडे एक लुडे । कृष्णा आवडती पुढें । बहु भाविक ते ॥६॥

करी कवतुक । त्यांचें देखोनियां मुख । हरी वाटतसे सुख । खदखदां हांसे ।

एक एकाचें उच्छिष्ट । खातां न मानिती वीट । केलीं लाजतां ही धीट । आपुलिया संगें ॥७॥

नाहीं ज्याची गेली भुक । त्याचें पसरवितो मुख । अवघियां देतो सुख । सारिखें चि हरी ।

म्हणती भला भला हरी । तुझी संगती रे बरी । आतां चाळविसी तरी । न वजों आणिकां सवें ॥८॥

गाई विसरल्या चार । पक्षी श्वापदांचे भार । जालें यमुनेचें स्थिर । जळ वाहों ठेलें ।

देव पाहाती सकळ । मुखें घोटूनियां लाळ । धन्य म्हणती गोपाळ । धिग जालों आम्ही ॥९॥

म्हणती कैसें करावें । म्हणती कैसें करावें । यमुनाजळीं व्हावें । मत्स्य शेष घ्यावया ।

सुरवरांचे थाट । भरलें यमुनेचें तट । तंव अधिक ची होंट । मटमटां वाजवी ॥१०॥

आनंदें सहित । क्रीडा करी गोपीनाथ । म्हणती यमुनेंत हात । नका धुऊं कोणी ।

म्हणती जाणे जीवीचें । लाजे त्यास येथें कैचें । शेष कृष्णाचें । लाभ थोरिवे ॥११॥

धन्य दिवस काळ । आजी पावला गोपाळ । म्हणती धालों रे सकळ । तुझिया नि हातें ।

मानवले गडी । एक एकांचे आवडी । दहीं खादलें परवडी । धणीवरी आजी ॥१२॥

तुझा संग बरवा । नित्य आम्हां द्यावा । ऐसें करूनि जीवा । नित्य देवा चालावें ।

तंव म्हणे वनमाळी । घ्यारे काठिया कांबळी । आतां जाऊं खेळीमेळीं । गाई चारावया ॥१३॥

तुका म्हणे प्रेमें धालीं । कोणा न साहवे चाली । गाई गोपाळांसि केली । आपण यांसरी ।

आजि जाला आनंद । आजि जाला आनंद । चाले परमानंद । सवें आम्हांसहित ॥१४॥

अर्थ :- यमुनातिरि उभे राहून श्रीकृष्ण सवंगड्यांना म्हणाले, तुम्ही सारेजन आपापल्या शिदोर्या घेऊन या. आज आपण काला करू. सर्व शिदोर्या एकत्र करू मी प्रथम त्याचा स्वाद घेतो. नंतर मझ्याकादिल शिदोरि त्यात घालतो व तुम्हाला वाटतो ।।1।।

बारे झाले, बारे झाले, अश सारे सवंगडि म्हणतात, ते सारेजन आनंदाने मोहरी, पावे वाजउ लागले, सर्वाणि आनंदाने खड़कावर आपली शिदोरि सोडली.सर्व एकत्र केलि. त्याचा काला करून तो श्रीकृष्ण सर्वाना देऊ लागला ।।ध्रु।।

सरे जन एकपुढे एक, आपले तोड़, हात। पसृ लागले. काल्याचे कवळ मिळाले की सुखी झाले. काल्याचा तो गोळा अधिकाधिक मिलावा असे त्यांना वाटू लागले. 'खुप गोड लागते. गोड वाटते', असे श्रीकृष्णला महान7 लागले 'आमचे पोट भरले नाही', 'आणखी दे', असे म्हणू लागले ।।2।।

भगवंताने अपाला हात मुखाजवळ नेला इतरांना आशा वाटू लागली व ते तोड़ वासु लागले. तो स्वतः खाउ लागला. इतरांना वाकुल्या दाखउ लागला, त्यांनी त्याला धरले ।।3।।

अरे, कान्हा लबाड़ आहे. घासासाठी आपल्या र्ानाट फिरतो. त्याच्या पाठीमागे तो शहाना डूम करतो. माझी माय असलेला कृष्ण सर्वांचे घास खातो. आकाशातील देवहि हाय हाय करू लागले व म्हणाले, आम्ही या सुखाला अंतरलो ।।4।।

गोपाळ एकमेकांच्या ढुंगनावर, पाठीवर, तोंडावर गोळे मारू लागले. ते छरीला सहन होईना. आता पुरझाले. आपण आता चांगले खेल खेळू, ऎसे तो सांगू लागला ।।5।।

सर्वांनी मोठ्या आनंदाने हरीला मधी घेतले व फेर धरला. काहीजण स्वतःभवती फिरु लागले. काही शिंग, बासरी वाजउ लागल. वाकडे, बोबडे, मुके, लुळ, खुजे सवंगडि होते; परंतु ते अत्यंत भाविक होते. ते कान्होबाचे लहुप आवडते होते ।।6।।

श्रीकृष्ण त्या सार्यांचे गोपजनांचे मनापासून कौतुक करात असे. त्यांचे मुख पाहुन छरीला खुप आनंद हॉट असे. निर्मल, प्रांजल भावनेने तो खदखदा हसत असे. एकमेकांचे उष्टे खान्यास त्यांना कधी कंटाळा येत नसे. जे कोणी लाजरे-बजरे होते. त्यांना हरिन आपल्या संगतिति धीट केले ।।7।।

ज्यांची भूक भागत नव्हती, त्यांना त्यांचे तोड़ उघडून भरविले. सर्वाना सारखे सुख दिले. गोपाळ म्हणाले, 'हे हरी, भला रे भला. तुझी सांगत खर्च खुप चांगली आहे रे! तू टोलवाटोलावि केलीस तरी आम्ही इतर कुनासोबत जाणार नाही ।।8।।

गाई वैरण खान्याच् विसरून गेल्या . पक्षी, पशु यांची तीच गत झाली, यमुना नधि वाहान्याची थांबली. मुखात लाळ घोटवित देव हे सारे पाहत होते. गोपाळ धन्य आहे, आमचा धिक्कार असो ! ।।9।।

आता कसे करावे, कसे करावे याचा विचार ते करू लागले. यमुनेतिल मासे होऊन त्यांचे उष्टे सेवन करण्यास जावे, देवांच्या समुदायाने यमुनेचे तट भरून गेले. गोपाल आपले होट पटपत वाजउ लागले ।।10।।

गोपीनाथ आपल्या सावंगड्यांबरोबर क्रीड़ा करात होता. त्याने दीवाना पाहिले. तो गोपाळांना म्हणाला, तुम्ही एमुनातिरि आपले हात धुवू नका, ते म्हणाले, 'हां कान्होबा सगल्यांच्या मनातले ओलखतो. कृष्णच्या उच्छीष्टाचि थोरवि जाणून, त्याचे हाव धरून ते येथे कशे प्राप्त होईल ? ।।11।।

गोपाल म्हणाले आजचा दिवस खरोखर धंन्य आहे. आज भगवंत दिसला. आम्ही सर्व तुझ्या हाटचा काला खाऊन तृप् झालो. एकमेलांच्या प्रेमामुळे सर्व संतृष्ट झाले. त्याच्या पंगतित पोटभर दखी खाल्ले ।।12।।

भगवंता, तुझी मैत्री चांगली आहे. आम्हाला ती नित्य लाभों. आमच्या जीवाला नेहमी असाच आनंद देत जावा. त्यावर कृष्ण म्हणाला. ''अरे, आता आपल्या काठ्या-कांबळी घ्या, हसत खेळत आपण गाई चारायला घेऊन जाउ ।।13।।

तुकाराम महाराज म्हणतात, हे सर्व प्रेमाने समाधान पावले होते. क9नालाही पुढे चलवेना. हरिन गाई- गोपाळांना आपल्यासारखे केले. आजचा हां आनंद म्हणजे ब्रम्हानंद आहे. त्याचे वर्णन करता येत नाही. परमानंद जातीने आपमच्याबरोबर स्वतःच जातीने हजर आहे ।।14।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा