अभंग ९९
हरिहरां भेद । नाहीं करूं नये वाद ॥१॥
एक एकाचे हृदयीं । गोडी साखरेच्या ठायीं ॥ध्रु.॥
भेदकासी नाड । एक वेलांटी च आड ॥२॥
उजवें वामांग । तुका म्हणे एक चि अंग ॥३॥
अर्थ :- हरी (विष्णु) आणि हर (शिव) यांच्यामधे भेद करून अकारण वाद निर्माण करू नये।।1।।
कारण ते दोन्ही एकच आहे, जसे साखर आणि तिची गोडी ।।ध्रु।।
फरक करणारयांच्या डोळ्याला एका वेलांटिचा फरक दिसतो ।।2।।
तुकोबा म्हणतात, उजवे व डावे दोन भाग एकत्र येऊन त्याचा देह बनतो ।।3।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा