अभंग ६३
कानडीनें केला मर्हाटा भ्रतार । एकाचें उत्तर एका न ये ॥१॥
तैसें मज नको करूं कमळापति । देई या संगति सज्जनांची ॥ध्रु.॥
तिनें पाचारिलें इल बा म्हणोन । येरु पळे आण जाली आतां ॥२॥
तुका म्हणे येर येरा जें विच्छिन्न । तेथें वाढे सीण सुखा पोटीं ॥३॥
अर्थ :- एका कानडी भाषा बोलनारया स्त्रीने मराठी भाषा बोलनारा नवरा केला , त्यांना एकमेकांचे बोलने न कळल्याणे विपर्यास निर्माण होत असे ।।1।।
तशी माझी स्तिति हे कमलापती, तू करू नकोस, मला संतसहवास घडू दे ।।ध्रु।।
त्या कानडी स्त्रीने त्याला 'इल बा' (इकडे या) म्हंटले ।।2।।
त्याने बा' म्हणजे बाबा असा अर्थ घेतला व भलता गैरसमज करून तो दूर पळू लागला. अशी परिस्तिती झाली म्हणजे जीवनात विसंगतीचे दुःख निर्माण होते, असे तुकोबा म्हणतात ।।3।।स
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा