रविवार, २ ऑगस्ट, २०१५

६२मैत्र केले महा बळी

अभंग ६२

मैत्र केले महा बळी । कामा न येती अंतकाळीं ॥१॥

आधीं घे रे रामनाम । सामा भरीं हा उत्तम ॥ध्रु.॥

नाहीं तरी यम । दांत खातो करकरा ॥२॥

धन मेळविलें कोडी । काळ घेतल्या न सोडी ॥३॥

कामा न ये हा परिवार । सैन्य लोक बहु फार ॥४॥

तंववरि मिरविसी बळ । जंव आला नाहीं काळ ॥५॥

तुका म्हणे बापा । चुकवीं चौर्‍याशींच्या खेपा ॥६॥

अर्थ :- महाबलवान मित्र जोडलेस तरि ते अंत:काळी उपयोगी पडत नाही ।।1।।

तेव्हा मृत्यु एण्याआधि रामनाम संपत्ति तू जमवुन ठेव ।।ध्रु।।

रामनामाचि संपत्ति नसेल तर यम (काळ) कराकरा दांत खाईल ।।2।।

धन-संपत्ति कितीही मिळवली तरी काळाचा आघात हा होणारच आहे ।।3।।

तुझ्याजवळ सैन्य, परिवार, नातेवाईक कितीही असले तरी शेवटी कोणीच कामाला येणार नाहीत ।।4।।

जो पर्यन्त काळाचा आघात होणार नाही तो पर्यंत तुझी शक्ति कामे करील ।।5।।

तुकोबा म्हणतात, चौरयांशीचा फेरा चुकविन्यासाठी, तुला राम नामाचे साधन जमविले पाहिजे ।।6।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा