रविवार, २ ऑगस्ट, २०१५

३६आम्ही सदैव सुडके । जवळीं येतां चोर धाके

अभंग ३

आम्ही सदैव सुडके । जवळीं येतां चोर धाके ॥ जाऊं पुडी भिकें । कुतरीं घर राखती ॥१॥

नांदणूक ऐसी सांगा । नाहीं तरी वांयां भागा ॥ थोरपण अंगा । तरी ऐसें आणावें ॥ध्रु.॥

अक्षय साचार । केलें सायासांनी घर ॥ एरंडसिंवार । दुजा भार न साहती ॥२॥

धन कण घरोघरीं । पोट भरे भिकेवरी ॥ जतन तीं करी । कोण गुरें वासरें ॥३॥

जाली सकळ निश्चिंती । भांडवल शेण माती ॥ झळझळीत भिंती । वृंदावनें तुळसीचीं ॥४॥

तुका म्हणे देवा । अवघा निरविला हेवा ॥ कुटुंबाची सेवा । तो चि करी आमुच्या ॥५॥

अर्थ :-  आम्ही गरीब आहोत, दरिद्री आहोत; त्यामुळे चोराचिलतांचे भय आम्हाला वाटत नाही. घर सोडून भिक्ष्या मागन्यास आम्ही जातो तेव्हा कुत्रि आमच्या घराच राखन करतात ।।1।।

अशी हरी भक्तिचि ख्याति आहे, हरी भक्तिमुळे आम्हाला थोरपंन लाभल आहे ।।ध्रु।।

आम्ही हरिभक्तीचे जे घर तयार केले आहे त्याला नाजुक लाकडे वापरली आहेत, एरांडालाही हां भार सोसवनार नाही।।2।।

आम्ही घरो घरी भिक्ष्या मागून उदरनिर्वाह करतो. आम्हा घारी शेन, माती असल्यामुळे तुलशीवृदावंन लखलखित झालेले दिसते ।।4।।
लौकिकदृष्टया आम्ही गरीब, दारिद्र असलो तरी आम्ही हरिभक्त आहोत, त्यामुळे आमच्या कुटुंबाचा भार विठ्ठलावर आहे, अशे आम्ही नशीबवान आहो, असे तुकोबा म्हणतात।।5।।

राम कृष्ण हरी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा