अभंग २३
हिरा ठेवितां ऐरणीं । वांचे मारितां जो घणीं ॥१॥
तोचि मोल पावे खरा । करणीचा होय चुरा ॥ध्रु.॥
मोहरा होय तोचि अंगें । सूत न जळे ज्याचे संगें ॥२॥
तुका म्हणे तोचि संत । सोसी जगाचे आघात ॥३॥
अर्थ :- खरा हीरा ऐरणीवर ठेऊन वरुण घन मारला तरी फुटत नाही ।।1।।
त्याच हिर्याला खरे मूल्य असते. चुरा होतो तो कृत्रिम होय ।।ध्रु।।
ज्याच्या संगतित सूत जळत नाही, तोच खरा मोहरा होय ।।2।।
तुकोबा म्हणतात, संत ही तसेच असतात, जे जगाचे आघात सहन करत असतात ।।3।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा