अभंग ४७
करावी ते पूजा मनें चि उत्तम । लौकिकाचें काम काय असे ॥१॥
कळावें तयासि कळे अंतरींचें । कारण तें साचें साचा अंगीं ॥ध्रु.॥
अतिशया अंतीं लाभ किंवा घात । फळ देतें चित्त बीजा ऐसें ॥२॥
तुका म्हणे जेणें राहे समाधान । ऐसें तें भजन पार पावी ॥३॥
अर्थ :- लौकिकदृष्टया पुजेचे अवडंबर माजविन्यापेक्षा मांसपूज्या सर्वात उत्तम ।।1।।
अशी मनसपूज्या ज्याच्यासाठी केले जाते त्याला ती कळते ।।ध्रु।।
सत्कृत्य करणार्याला चांगले फळ मिलते, तर दुष्कृत्य करणार्याचा घात होतो; अशी बिज्याप्रमाने फळप्राप्ति होते ।।2।।
तुकोबा म्हणतात, जे जीवाला समाधान समाधान मिळउन देते तच खरे हरिभजन होय, तेच जीवाला भवसागर पार करून नेट ।।3।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा