अभंग ४०
परिमळ म्हणूनी चोळूं नये फूल । खाऊं नये मूल आवडतें ॥१॥
मोतियाचें पाणी चाखूं नये स्वाद । यंत्र भेदुनि नाद पाहूं नये ॥२॥
कर्मफळ म्हणुनी इच्छूं नये काम । तुका म्हणे वर्म दावूं लोकां ॥३॥
अर्थ:- फुले सुगंधी असता त्याचा वास घेन्या करता त्याचा चोला मोळा करू नये, गोजिरे मूल आपल्याला आवते तर ते आपण खात नाही।।1।।
मोत्याचे पानी निर्मल आहे म्हणून मोती चाखु नये, विविध वाद्य मधुर वाजतात म्हणून ती फोड़ू पाहू नये।।ध्रु।।
तसेच कर्म केल्या नंतर त्याच्या फलाची अपेक्षया करू नये, हेच भक्तीचे वर्म आहे, ऐसे तुकोबा म्हणतात।।2।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा