अभंग ३५
जया नाहीं नेम एकादशीव्रत । जाणावें तें प्रेत शव लोकीं ॥१॥
त्याचें वय नित्य काळ लेखीताहे । रागें दात खाय कराकरा ॥ध्रु.॥
जयाचिये द्वारीं तुळसीवृंदावन । नाहीं तें स्मशान गृह जाणां ॥२॥
जये कुळीं नाहीं एक ही वैष्णव । त्याचा बुडे भवनदीतापा ॥३॥
विठोबाचें नाम नुच्चारी जें तोंड । प्रत्यक्ष तें कुंड रजकाचें ॥४॥
तुका म्हणे त्याचे काष्ठ हातपाय । कीर्तना नव जाय हरीचिया ॥५॥
अर्थ :- जो नेमधर्म, एकादशी व्रत पाळीत नाही, तो प्रेतासमान समजला जातो ।।1।।
काळही त्याच्यावर रागाउंन करकरा दांत खात असतो ।।ध्रु।।
ज्याच्या दारामधे तुलशीवृन्दावन नाही, ते घर स्मश्याणा प्रमाणे आहे ।।2।।
ज्या मुखामधे विठ्ठलाचे नावच येत नाही, ते चर्मकाराचे कुंड समजले जाते ।।3।।
तुकोबा म्हणतात जो हरी कीर्तनाला जात नाही, त्याचे हात पाय लकड़ा प्रमाणे भासतात, असे मानावे।।4।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा