अभंग २०
आम्ही जरी आस । जालों टाकोनि उदास ॥१॥
आतां कोण भय धरी । पुढें मरणाचें हरी ॥ध्रु.॥
भलते ठायीं पडों । देह तुरंगीं हा चढो ॥२॥
तुमचें तुम्हांपासीं । आम्ही आहों जैसीं तैसीं ॥३॥
गेले मानामान । सुखदुःखाचें खंडन ॥४॥
तुका म्हणे चित्तीं । नाहीं वागवीत खंती ॥५॥
अर्थ :- आम्ही प्रपंच्यातील सर्व आशा- अपेक्षा, विषयवासना सोडून प्रपंच्याविषयी उदासीन झालो आहो ।।1।।
हे परमेश्वरा, त्यामुळे आता आम्हाला मरणाची भीति वाटत नाही ।।ध्रु।।
जीवनात आम्ही विठ्ठलाचे दास बनूण राहु; मग भले सुख येवु वा दुःख येवो ।।3
माणपान, सुखदुःखाचे आमच्या जीवनातून उच्च्याटन झाले आहे ।।4।।
तुकोबा म्हणतात, या माझ्या प्रपंच्याविषयीच्या उदासिनतेचि मला खंत वाटत नाही ।।5।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा