गुरुवार, २० ऑगस्ट, २०१५

९४शब्दा नाहीं धीर । ज्याची बुद्धि नाहीं स्थिर

अभंग ९४

शब्दा नाहीं धीर । ज्याची बुद्धि नाहीं स्थिर ॥१॥

त्याचें न व्हावे दर्शन । खळा पंगती भोजन ॥ध्रु.॥

संतास जो निंदी । अधम लोभासाठीं वंदी ॥२॥

तुका म्हणे पोटीं । भाव अणीक जया होटीं ॥३॥

अर्थ :-ज्याच्या शब्दाला स्थैर्य नाही, ज्याची बुद्धि अस्तीर आहे ।।1।।

आशा पापी व्यक्तींचे चुकुनहि दर्शन घेऊ नये, त्याच्या पंगतिला भोजनाचे लाभ घेऊ नये ।।ध्रु।।

तो दुर्जन संतांची निंदा करतो व द्रव्यालाभासाठी अधम श्रीमंतांच्या पाया पडतो ।।2।।

तुकाराम महाराज म्हणतात, अश्या व्यक्तींच्या पोटातील (हृदयातील) व ओठातील (वानीतिल) भाव वेगवेगळा असतो ।।3।।.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा