अभंग ५७
योगाचें तें भाग्य क्षमा । आधीं दमा इंद्रियें ॥१॥
अवघीं भाग्यें येती घरा । देव सोयरा जालिया ॥ध्रु.॥
मिरासीचें म्हूण सेत । नाहीं देत पीक उगें ॥२॥
तुका म्हणे उचित जाणां । उगीं सिणा काशाला ॥३॥
अर्थ :- जो इंद्रियांचे दमन करतो, ज्याच्या चित्तामद्धे क्षमा आहे तो योगी असतो ।।11।।
त्यामुळे देव त्याचा सोयरा होतो आणि त्याला सर्व सुखांची प्राप्ति होते ।।ध्रु।।
ज्या प्रमाणे स्वत:च्या शेतातसुद्धा कष्ट केलताशिवाय पिक येत नाही ।।2।।
म्हणून तुकोबा म्हणतात, योग्य-अयोग्य जाणून घ्या , नाहीतर वृथा शीन कशाला ।।3।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा