अभंग १०६
बोललों तें कांहीं तुमचिया हिता । वचन नेणतां क्षमा कीजे ॥१॥
वाट दावी तया न लगे रुसावें । अतित्याई जीवें नाश पावे ॥ध्रु.॥
निंब दिला रोग तुटाया अंतरीं । पोभाळितां वरि आंत चरे ॥२॥
तुका म्हणे हित देखण्यासि कळे । पडती आंधळे कूपा माजी ॥३॥
अर्थ :- मी तुम्हाला तुमच्या हिताची काही सांगतांना अधिक-उणे बोललो असेल तर तुम्ही मला क्षमा करा ।।1।।
जो योग्य मार्ग दाखवितो तो काही अधिक बोलला तर त्याच्यावर रुसु नये; नाहीतर आपलेच नुक्सान होते।।ध्रु।।
वैद्याने पोटशूलावर कडूनिंबाचा रस दिला, तर तो पोटात न घेता पाटा वर चोळला तर रोग बरा होणार नाही ।।2।।
तुकोबा म्हणतात, डोळस मनाच्या माणसाला आपले हित कळते, मुर्ख मात्र संकताच्या गर्तेत कोसळतात ।।3।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा