अभंग २८
महारासि सिवे । कोपे ब्राम्हण तो नव्हे ॥१॥
तया प्रायश्चित्त कांहीं । देहत्याग करितां नाहीं ॥ध्रु.॥
नातळे चांडाळ । त्याचा अंतरीं विटाळ ॥२॥
ज्याचा संग चित्तीं । तुका म्हणे तो त्या याती ॥३॥
अर्थ :- ज्याने अजुन क्रोधचा त्याग केला नाही तो जातीने ब्राम्हण असला तरी त्याला ब्रांम्हण म्हणू नये ।।1।।
त्याने देहान्त प्रयाचित्त जरी घेतले तरी त्याची शुद्धि होत नाही ।।ध्रु।।
आशा मनुष्याचा चांडाळास देखल विटाळ होतो कारण त्याचे मन रागामुळे विताळलेले असते ।।2।।
तुकोबा म्हणतात, आशा व्यक्तीला स्पर्श करणारा, त्याच्या सानिध्यात राहणार्याला सुद्धा तीच रुत्ति प्राप्त होते ।।3।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा