अभंग ९७
कांहीं नित्यनेमाविण । अन्न खाय तो श्वान ॥ वांयां मनुष्यपण । भार वाहे तो वृषभ ॥१॥
त्याचा होय भूमी भार । नेणे यातीचा आचार ॥ जाला दावेदार । भोगवी अघोर पितरांसि ॥ध्रु.॥
अखंड अशुभ वाणी । खरें न बोले स्वप्नीं ॥ पापी तयाहुनी । आणीक नाहीं दुसरा ॥२॥
पोट पोसी एकला । भूतीं दया नाहीं ज्याला ॥ पाठीं लागे आल्या । अतिताचे दाराशीं ॥३॥
कांहीं संतांचे पूजन । न घडे तीर्थांचें भ्रमण ॥ यमाचा आंदण । सीण थोर पावेल ॥४॥
तुका म्हणे त्यांनीं । मनुष्यपणा केली हानी ॥ देवा विसरूनी । गेलीं म्हणतां मी माझें ॥५॥
अर्थ :- दररोज कही पारमार्थिक नित्यनेम केल्यावाचुन जो अन्न खातो, तो कुत्र्या सामान असतो, मनुष्यदेहाचा भार वाहनारा तो निव्वळ बैल असतो ।।1।।
त्याचा भूमिला भार होतो, त्याचे आचरण शुद्ध नसते; त्यामुळे त्याचे पितर नारकवासना भोगत असतात ।।ध्रु।।
त्याची वाणी अमंगळ असते, तो स्वप्नारसुधा खरे बोलत नाही, त्याच्यासारखा पापी शोधून सपडनार नाही ।।2।।
तो फक्त आपल्या कुटुंबाचे पोट भरतो, त्याच्याजवळ भूतदया नाही, दाराशि आलेल्या अतिथिला हाकलुन देतो ।।3।।
त्याच्या हातून संतसेवा, तीर्थयात्रा घडत नाही, तो म्हणजे यमाला दिलेला एक ठेवा आहे, यम त्याला भरपूर दुःख देईल ।।4।।
तुकोबा म्हणतात, अश्या व्यक्ति जन्माला येऊन स्वत:चेच नूकसान करून घेतात; कारण प्रपंच्यायत ते रामुन जातात, त्यांना परमेश्वराची आठवण येत नाही ।।5।।.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा