शनिवार, १ ऑगस्ट, २०१५

दुजें खंडे तरी । उरला तो अवघा हरि १८

अभंग 18

दुजें खंडे तरी । उरला तो अवघा हरि ॥ आपणाबाहेरी । न लगे ठाव धुंडावा ॥१॥

इतुलें जाणावया जाणा । कोंडें तरी मनें मना ॥ पारधीच्या खुणा । जाणतें चि साधावे ॥ध्रु.॥

देह आधीं काय खरा । देहसंबंधपसारा ॥ बुजगावणें चोरा । रक्षणसें भासतें ॥२॥

तुका करी जागा । नको चाचपूं वाउगा ॥ आहेसि तूं आगा । अंगीं डोळे उघडी ॥३॥

अर्थ :-  ज्ञान मिळाल्यामुळे द्वैतभावनेचा निरास होतो, सर्वत्र परमेश्वराचा संचार आहे , हे ध्यानात येते; त्यामुळे आपल्यामधील आत्माराम ओलखता येतो ।।1।।

हे रहस्य जाणून घेण्यासाठी या आत्मारामचि ओळख पटउन घेतली पाहिजे. ज्या प्रमाणे परध्याचि कला पार्ध्यालाच अवगत असते, तसे विष्णुदासाचे मन परमेश्वराला जाणून त्याच्याशी एकरूप होते ।।ध्रु।।

विष्यवासनेमधे गुंतलेला हां देह खरा आहे का हे समजल्यावर देहासंमंधीचा पसारा खारा की खोटा हे लक्ष्यात येते. जसे शेतीतिल बुजगावने चोराला पिकाचे रक्षण करणारे वाटते, तसा भ्रम मनुष्याच्या मनात देहाविषई निर्माण होतो ।।2।।

तुकाराम महाराज म्हणतात, हे जीवा, जागा हो आणि तुझ्यामधील आत्मारामाला ओळख पटउन घे; कारण तूच परमेश्वरस्वरूप आहेस ।।3।।

।।राम कृष्ण हरी।।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा