अभंग २५
माझिया मीपणा । जाला यावरी उगाणा ॥१॥
भोगी त्यागी पांडुरंग । त्यानें वसविलें अंग ॥ध्रु.॥
टाळिलें निमित्त । फार थोडें घात हित ॥२॥
यावें कामावरी । तुका म्हणे नाहीं उरी ॥३॥
अर्थ :- संत-सज्जनांमुळे मझ्यातील मी पण लयास गेले आहे ।।1।।
कारण प्रपंच्यातील विषयभोग आम्ही भोगत नसून, आमच्या हृदयतील परमेश्वर भोगत असतो ।।ध्रु।।
त्या मुळे जीवनातील कर्म-कुकर्मचि चिंता उरली नाही, असे तुकाराम महाराज म्हणतात ।।3।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा