अभंग ६५
बोलायाचा त्यासीं । नको संबंध मानसीं ॥१॥
जया घडली संतनिंदा । तुज विसरूनि गोविंदा ॥ध्रु.॥
जळो त्याचें तोंड । नको दृष्टीपुढें भांड ॥२॥
तुका म्हणे देवा । तया दुरी मज ठेवा ॥३॥
अर्थ :- जे संतांची निंदा करणारे नास्तिक लोक असतात त्यांचा माझा संमंध येऊ नये ।।1।।
हे गोविंदा, जे तुला विसरतात, ते संतांची निंदा करतात ।।ध्रु।।
अश्या नास्तिकांचे तोड़ पाहण्याची देखील माझी ईछया नाही, असे लोक माझ्या दृष्टिस पडू नयेत ।।2।।
तुकोबा म्हणतात, हे परमेश्वरा, मला त्यांच्यापासून दूर ठेव ।।3।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा