शुक्रवार, ७ ऑगस्ट, २०१५

८३जेणें घडे नारायणीं अंतराय । होत बाप माय

अभंग ८३
जेणें घडे नारायणीं अंतराय । होत बाप माय वर्जावीं तीं ॥१॥
येर प्रिया पुत्र धना कोण लेखा । करिती तीं दुःखा पात्र शत्रु ॥ध्रु.॥
प्रल्हादें जनक बिभीषणें बंधु । राज्य माता निंदु भरतें केली ॥२॥
तुका म्हणे सर्व धर्म हरिचे पाय । आणीक उपाय दुःखमूळ ॥३॥
अर्थ :- परमेश्वरचि भक्ति करतांना प्रतक्ष जन्मदाते जरी आड़ आले तरी त्यांना दूर सारावे ।।1।।
पत्नी, पुत्र, धन यांनाही पमार्थापासून दूर ठेवावे, परमार्थ मार्गात आड़ येणारे सर्व शत्रु आहेत ।।ध्रु।।
तुकोबा असे त्याग केल्याची उदाहरणे देतात. प्रल्हादाने आपल्या माता पीत्यांचा, बिभीषणाने बंधू रावनाचा, भारताने माता कैकेयीचा त्याग करून परमार्थ साधला ।।2।।
तुकाराम महाराज म्हणतात, सर्वधर्म हरिच्या पायाशि असतांना इतर केलेले उपाय म्हणजे दुःखाचें मूळ आहेत ।।3।।.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा