अभंग ८७
न करीं रे संग राहें रे निश्चळ । लागों नेदीं मळ ममतेचा ॥१॥
या नांवें अद्वैत खरें ब्रम्हज्ञान । अनुभवावांचून बडबड ते ॥ध्रु.॥
इंद्रियांचा जय वासनेचा क्षय । संकल्पा ही न ये वरी मन ॥२॥
तुका म्हणे न ये जाणीव अंतरा । अंतरीं या थारा आनंदाचा ॥३॥
अर्थ :- हे परमार्थी जीवा, तू संसाराचा संग करू नको, नीश्चिल रहा, मनाला माया- माहाचा मळ लागू देऊ नको ।।1।।
अशी मनाची निसं:ग अवस्था म्हणजेच खरे आत्मज्ञान, ब्रम्हज्ञान होय, बाको सर्व अनुभवावाचुन केलेले निष्फल बड़बड़ आहे ।।ध्रु।।
इंद्रियांचे दमन करूँ त्यांच्यावर विजय मिळविने, वासना, कामना, नाहीशी करणे, प्रपंच्याची आसक्ति मनमधुन काढून टाकने ।।2।।
तुकोबा म्हणतात, अश्या व्यक्तीच्या ठिकाणी अहंणकार नाहिसा होतो आणि आनंडीआनंद निर्माण होतो ।।3।।
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा